शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

पुन्हा उभारली बांधकामे

By admin | Updated: June 6, 2014 01:39 IST

तावडे हॉटेल परिसर अतिक्रमण : न्यायालयाचा आदेश धाब्यावर; नियमितीसाठी फुटली सुपारी?

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेस १६ जूनपर्यंत स्थगिती देत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर येथील कारवाईचा धडाका थांबला. मात्र, आता अतिक्रमणाच्या कारवाईतून न्यायालयातूनच मान सोडविण्यासाठी महापालिकेनेच मदत करावी, यासाठी येथे एक यंत्रणा सक्रिय झाली आहे. पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत; यामुळेच या परिसरातील अनेक व्यापार्‍यांनी न्यायालयाचा आदेश झुगारून पाडलेली बांधकामे पुन्हा बांधण्यास सुरुवात केली आहे. महापालिका यंत्रणा मात्र या प्रकरणी तोंडावर हात ठेवून गप्प असल्याचे चित्र आहे. उचगाव ते तावडे हॉटेलदरम्यान महापालिकेने कचरा डेपो व ट्रक टर्मिनससाठी आरक्षित केलेल्या १३८ जागांवर १०० कोटींची अवैध बांधकामे करण्यात आली. हा सर्व प्रकार उचगाव ग्रामपंचायत व महापालिकेचा नगररचना विभागाच्या मेहरबानीमुळेच सुरू झाल्याचा आरोप प्रशासनावर होत होता. काही माजी नगरसेवकांनी याविरोधात आवाज उठविला; तर जिल्हा न्यायालयाने तावडे हॉटेल परिसरातील जागेवर महापालिकेची मालकी असल्याचा निवाडा दिला. त्यामुळे महापालिकेला या अतिक्रमणाविरोधात कारवाई करणे अनिवार्य बनले. नगररचना विभागाने तातडीने या मिळकतधारकांना नोटिसा काढल्या; मात्र येथील १३८ मिळकतधारकांपैकी मोठ्या मिळकती असलेल्या ४०हून अधिक जणांची नावे नोटिसीतून वगळली व उर्वरित अतिक्रमणधारकांवर २६ व २७ मे रोजी कारवाई करून, तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील महापालिकेच्या तब्बल २४ एकरांहून अधिक जागेत झालेली अतिक्रमणे व अवैध बांधकामे हटविण्याचा धडाका लावला. पोलीस बळाचा वापर करून किरकोळ विरोध मोडीत काढत महापालिकेच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी अतिक्रमण हटाव मोहीम ‘फत्ते’ होणार असे वाटत असतानाच उच्च न्यायालयाने १६ जूनपर्यंत कारवाई स्थगित ठेवत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले. महापालिका कारवाईचे नाटक करील; प्रत्यक्षात काही करणार नाही, अशी येथील व्यापार्‍यांची अटकळ होती. प्रत्यक्षात कारवाईचा धडाक ा पाहून व्यापार्‍यांची गाळण उडाली. अतिक्रमण हटवीत असतानाच अनेक व्यापारी कारभारी नगरसेवकांना ‘साहेब, बाजूला चला, बोलूया’ अशी ‘आॅफर’ देत होते. व्यापार्‍यांची अर्ज फेटाळत कारवाईचा धडाका लावण्यात आला. न्यायालयाच्या निकालानंतर आपले काही खरे नाही याची प्रचिती आल्याने तावडे हॉटेल परिसरातील एक गट पुन्हा महापालिकेतील यंत्रणाच विकत घेण्याच्या मागे लागला आहे. दोन कारभारी नगरसेवक गळाले लागले असून त्यांच्यात बैठकीच्या तीन फेर्‍या झाल्या आहेत. महापालिकेने न्यायालयात कच्ची कागदपत्रे सादर करून व्यापार्‍यांना दिलासा द्यावा, न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम ठेवल्यास अतिक्रमण केलेल्या मिळकतींना अभय देण्यासाठी पैसे भरून नियमितीकरणाचा मार्ग शोधून द्यावा, असे पर्याय पुढे आले आहेत. यासाठी कोट्यवधींची सुपारी फुटल्याची चर्चा महापालिकेत जोरात सुरू आहे.