शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

लसीकरणात टंचाईचा पुन्हा व्यत्यय, कोविशिल्ड लस संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोविशिल्ड लसीचा पुरवठा खंडित झाल्याने पुन्हा एकदा शहरातील लसीकरणात व्यत्यय आला आहे. त्यामुळे पहिला डोस घेऊन ज्यांचे ...

कोल्हापूर : कोविशिल्ड लसीचा पुरवठा खंडित झाल्याने पुन्हा एकदा शहरातील लसीकरणात व्यत्यय आला आहे. त्यामुळे पहिला डोस घेऊन ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झाले, त्यांना आता लसीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

लसीकरणाच्या सुरुवातीला पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेण्यास सांगण्यात आले. परंतु, लसीचा नियमित पुरवठा होत नसल्याने २८ दिवसांचा कालावधी ८४ दिवसांपर्यंत वाढविण्यात आला. काही दिवस ८४ दिवस पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना सहज, विनागोंधळ लस मिळायला लागली. परंतु, आता पुन्हा एकदा लसीचा तुटवडा जाणवायला लागला आहे.

गुरुवारी लस नसल्यामुळे दोन केंद्रांमधून केवळ १६ नागरिकांचे लसीकरण झाले. यामध्ये महाडीक माळ येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात १० तर फुलेवाडी येथील केंद्रात सहा नागरिकांचे लसीकरण झाले. त्यामुळे ८४ दिवस पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अनेकांना लस मिळाली नाही. त्यांना आता लस मिळण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. शुक्रवारी सुद्धा अनेक नागरिकांना ८४ दिवस पूर्ण झाल्यामुळे शासनाच्या पोर्टलद्वारे कोविशिल्ड लस घेण्याबाबत मेसेज पाठविले आहेत. परंतु, जर लस मिळाली नाही तर त्यांनाही प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शहरात आतापर्यंत एक लाख २४ हजार ७७७ नागरिकांना पहिल्या डोसचे तर ४६ हजार ९०१ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.

कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी ज्यांचे २८ दिवस पूर्ण झालेले आहेत, अशा नागरिकांनी शुक्रवारी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले, फिरंगाई, कसबा बावडा, महाडिक माळ, सिद्धार्थनगर व फुलेवाडी येथील नागरी आरोग्य केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे. कोविशिल्ड लस शिल्लक नसल्याने त्याबाबतचे नियोजन करण्यात आलेले नाही.

कोट -

पहिला डोस घेऊन ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना जर लस मिळाली नसेल तर काही काळजी करण्यासारखे कारण नाही. ११२ दिवसांपर्यंत दुसरा डोस घेतला तरी चालतो. जशी लस उपलब्ध होईल, तशी प्राधान्याने ज्यांना आवश्यक आहे अशांना लस घेण्यासाठी फोन केले जात आहेत.

डॉ. अमोलकुमार माने,

प्रभारी आरोग्याधिकारी, महापालिका