शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

जुन्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार

By admin | Updated: May 31, 2017 21:52 IST

जिल्हा बँकांना झटका : २७० कोटींच्या नोटांचे करायचे काय?

कोल्हापूर : नोटाबंदीच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला. याबाबतचा अध्यादेश रिझर्व्ह बँकेने बुधवारी काढला आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांत गेली सहा महिने पडून असलेले हजारो कोटी रुपयांचे करायचे काय, असा प्रश्न बँकांसमोर आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेत तब्बल २७० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आहेत. रिझर्व्ह बँकेने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला घेतला होता. तीन दिवसांत जिल्हा बँकेने रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने जुन्या नोटा स्वीकारल्या होत्या. राज्यभरातील जिल्हा बँकांना सुमारे साडेसहा हजार कोटींच्या नोटा जमा झाल्या होत्या; पण या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने टाळाटाळ केली होती. या नोटाबाबत ‘नाबार्ड’ने दोनवेळा तपासणी केली तरीही रिझर्व्ह बँकेकडून नोटा स्वीकारण्याच्या कोणत्याच हालचाली दिसत नसल्याने जिल्हा बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने नोटाबंदी काळात जमा झालेल्या जुन्या नोटांच्या खात्यांची केवायसी तपासणीचे आदेश दिले. केवायसी पूर्तता असेल तर नोटा स्वीकारण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेला दिले होते. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने ‘नाबार्ड’च्या माध्यमातून तिसऱ्यांदा तपासणी केली. त्यामध्ये राज्यातील बहुतांशी जिल्हा बँकांची १०० टक्के केवायसी पूर्तता झालेले निदर्शनास आले. त्यामुळे नोटा स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला होता पण तपासणी करून महिना उलटला तरी अद्याप नोटा स्वीकारण्यास काहीच हालचाली दिसत नसल्याने जिल्हा बँकांचे प्रशासन हवालदिल झाले आहे. हजारो कोटींच्या नोटा सहा महिने पडून असल्याने कोट्यवधी रुपयांचा व्याजाचा भुर्दंड बँकांना बसला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना अडचणी येत आहेत. तोपर्यंत रिझर्व्ह बँकेने या नोटा स्वीकारणार नाहीच, असा फतवा काढल्याने जिल्हा बँकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेत २७० कोटी रुपये पडून असल्याने बँकेला दरमहा ४७ कोटींचा फटका बसत आहे. त्यात सध्या शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज देण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यात रिझर्व्ह बँकेने असा निर्णय घेतल्याने बॅँकेचे कंबरडे मोडणार आहे. 

पुण्यासह चार बँकांत सर्वाधिक रक्कम नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकांत ५०० व १००० रुपयांच्या सर्वाधिक नोटा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा झाल्या. नाशिक, सांगलीपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा बँकेतही मोठी रक्कम जमा झाली. ‘केवायसी’ची पूर्तता झाल्यानंतर जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, असे रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. जर रिझर्व्ह बँकेने नोटा न स्वीकारण्याचा निर्णय घेतला तर जिल्हा बँका उद्ध्वस्त होणार आहेत. शेतकऱ्यांना कर्ज देताना अडचण येणार आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेविरोधात अवमान याचिका दाखल करावी लागेल. - आमदार हसन मुश्रीफ (अध्यक्ष, जिल्हा बँक)