शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रेशन ग्राहकांचा २६ मार्चला सरकारविरोधात ‘एल्गार’

By admin | Updated: February 27, 2015 00:17 IST

मुंबईत निघणार मोर्चा : रेशन बचाव प्रतिनिधींच्या राज्यस्तरीय बैठकीत निर्णय

कोल्हापूर : रेशन व्यवस्थेबाबत सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध करण्यासाठी २६ मार्चला रेशन ग्राहकांचा राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय गुुुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत झाला. यासाठी मोहिमा, सभा, संमेलने, परिषदा, मेळावे या माध्यमांतून जनजागरणाकरिता सूत्रबद्ध कार्यक्रम आखण्याचेही ठरले. टाटा समाज विज्ञान अकादमी येथे राज्यातील रेशन चळवळीतील २२ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेशन बचाव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शोषित जनआंदोलन समितीच्या अध्यक्षा उल्का महाजन होत्या.दिवसभर चाललेल्या बैठकीत सरकारच्या रेशन धोरणावर सविस्तर चर्चा होऊन विविध महत्त्वपूर्ण निर्णय झाले. यामध्ये २६ मार्चला मुंबईत रेशन ग्राहकांचा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येईल. सकाळी ११ वाजता हा मोर्चा सुरू होऊन तो कोतवाल गार्डन ते चैत्यभूमी असा जाईल. शांताकुमार समितीच्या शिफारशी रद्द कराव्यात. रोख अनुदानाऐवजी रेशनवर धान्य पाहिजे. केशरी कार्डावरील धान्याची तरतूद झालीच पाहिजे. अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना १२ किलो धान्य मिळाले पाहिजे, यांचा समावेश आहे.सरकारच्या रेशन धोरणाविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी जनतेची राज्यव्यापी चळवळ उभी करणे गरजेचे असल्याचे चंद्रकांत यादव यांनी सांगितले. त्यानुसार जनजागरणासाठी मोहिमा, सभा, संमेलने, परिषदा, मेळावे या माध्यमांतून सूत्रबद्ध कार्यक्रम आखला जावा, असेही त्यांनी सांगितले. त्याला सर्वांनी एकमुखी मान्यता दिली. दरम्यान, कोल्हापुरातील रेशनविरोधी निघालेल्या भव्य मोर्चाची दखल राज्यभरातील संघटनांनी घेतली.यावेळी रेशन कृती समितीचे सुरेश सावंत, अन्न अधिकार अभियानाच्या मुक्ता श्रीवास्तव, जनहित मोर्चाचे रिची बऊ, न्यायालयनियुक्त सल्लागार समितीचे प्रतिनिधी डॉ. अण्णा शिरवाडकर, ‘मूव्हमेंट चीफ अ‍ॅँड जस्टिस’चे शब्बीर देशमुख, आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)