शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

रेशन ग्राहकांचा २६ मार्चला सरकारविरोधात ‘एल्गार’

By admin | Updated: February 27, 2015 00:17 IST

मुंबईत निघणार मोर्चा : रेशन बचाव प्रतिनिधींच्या राज्यस्तरीय बैठकीत निर्णय

कोल्हापूर : रेशन व्यवस्थेबाबत सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध करण्यासाठी २६ मार्चला रेशन ग्राहकांचा राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय गुुुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत झाला. यासाठी मोहिमा, सभा, संमेलने, परिषदा, मेळावे या माध्यमांतून जनजागरणाकरिता सूत्रबद्ध कार्यक्रम आखण्याचेही ठरले. टाटा समाज विज्ञान अकादमी येथे राज्यातील रेशन चळवळीतील २२ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेशन बचाव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शोषित जनआंदोलन समितीच्या अध्यक्षा उल्का महाजन होत्या.दिवसभर चाललेल्या बैठकीत सरकारच्या रेशन धोरणावर सविस्तर चर्चा होऊन विविध महत्त्वपूर्ण निर्णय झाले. यामध्ये २६ मार्चला मुंबईत रेशन ग्राहकांचा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येईल. सकाळी ११ वाजता हा मोर्चा सुरू होऊन तो कोतवाल गार्डन ते चैत्यभूमी असा जाईल. शांताकुमार समितीच्या शिफारशी रद्द कराव्यात. रोख अनुदानाऐवजी रेशनवर धान्य पाहिजे. केशरी कार्डावरील धान्याची तरतूद झालीच पाहिजे. अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना १२ किलो धान्य मिळाले पाहिजे, यांचा समावेश आहे.सरकारच्या रेशन धोरणाविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी जनतेची राज्यव्यापी चळवळ उभी करणे गरजेचे असल्याचे चंद्रकांत यादव यांनी सांगितले. त्यानुसार जनजागरणासाठी मोहिमा, सभा, संमेलने, परिषदा, मेळावे या माध्यमांतून सूत्रबद्ध कार्यक्रम आखला जावा, असेही त्यांनी सांगितले. त्याला सर्वांनी एकमुखी मान्यता दिली. दरम्यान, कोल्हापुरातील रेशनविरोधी निघालेल्या भव्य मोर्चाची दखल राज्यभरातील संघटनांनी घेतली.यावेळी रेशन कृती समितीचे सुरेश सावंत, अन्न अधिकार अभियानाच्या मुक्ता श्रीवास्तव, जनहित मोर्चाचे रिची बऊ, न्यायालयनियुक्त सल्लागार समितीचे प्रतिनिधी डॉ. अण्णा शिरवाडकर, ‘मूव्हमेंट चीफ अ‍ॅँड जस्टिस’चे शब्बीर देशमुख, आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)