शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

रंकाळा - आरे एस.टी. बससेवा पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:18 IST

माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालये सुरू झाली आहेत; मात्र करवीर तालुक्यातील पश्चिम भागातील ...

माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालये सुरू झाली आहेत; मात्र करवीर तालुक्यातील पश्चिम भागातील रंकाळा-आरे एसटी सेवा नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावे लागत आहे, तर नागरिकांना व नोकरदारांना हळदीपर्यंत पायपीट करून एस.टी किंवा खासगी वडापचा आधार घ्यावा लागत आहे.

यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने रंकाळा आगारातून नियमित बससेवा सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

करवीर तालुक्यातील पश्चिम भागातून अनेक शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी माध्यमिक उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर, भोगावती व अन्य ठिकाणी, तर अनेक प्रवासी प्रवास करीत असतात; परंतु कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एसटी बस सेवा पूर्णपणे बंद होती. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये शीतलता आणूनही या ग्रामीण भागांमध्ये एसटी सेवा पूर्ववत सुरू झाली नाही. कित्येक गावांत आठ महिन्यांपासून गावामध्ये एसटीचे दर्शनही नाही. गेली दहा ते बारा दिवसांपासून शाळा व महाविद्यालय सुरू करण्यात आल्या आहेत, तर करवीरच्या पश्चिम भागातील एस.टी. बस सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना व प्रवाशांना पाच ते दहा किलोमीटर पायपीट करून खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे, तर एस.टी. बस सुरू नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे संभाजीनगर व रंकाळा बसस्थानक नियंत्रक कार्यालयाने याकडे लक्ष देऊन रंकाळा ते आरे व अन्य एस.टी. सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी करवीर तालुक्यातील पश्चिम भागातून होत आहे.