शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वीजदरवाढीविरुद्ध मेळावा

By admin | Updated: August 11, 2015 01:09 IST

एन. डी. पाटील : शेतकरी ठरविणार १८ रोजी आंदोलनाची दिशा

कोल्हापूर : शासनाने कृषी पंपांना ४४ पैशांची एकतर्फी दरवाढ केली आहे. या अन्यायी वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १८ आॅगस्टला सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केले. डॉ. पाटील म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून वीज दरवाढीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. मध्यंतरी वीज नियामक आयोगाकडे हरकती दाखल करून बाजूही मांडली. विधानसभेत कृषिपंपांची वीज दरवाढ करणार नसल्याचे ऊर्जामंत्री यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र ७२ पैसे प्रतियुनिट असलेला कृषी पंपाचा वीजदर १ रुपये १६ पैसे केली आहे. तब्बल ४४ पैशांची अन्यायी वीज दरवाढ लादली आहे. ही दरवाढ मुकाटपणे सहन केल्यास पुन्हा भविष्यात शेतकऱ्यांवर वीज दरवाढीचे मोठे संकट येण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या केलेल्या दरवाढीला आमचा कडाडून विरोध आहे. दरवाढीमुळे शेतकरी आर्थिक संकटात येणार आहे. शेतमालाला उत्पादन खर्चावर दर मिळत नसल्याने बळिराजा अडचणीत आहे. उसाचे बिल सात, आठ महिन्यांनंतरही मिळालेली नाहीत. पावसाची वक्रदृष्टी आहे. उभी पिके वाळत आहेत. राज्यात दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दिलासा देण्याऐवजी वीज दरवाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. राज्यातील सर्व कृषी पंपांचे वीजदर शेजारील सर्वच राज्यांपेक्षा दुप्पट, दीडपट आहेत. शेतकऱ्यांनी कर्जबाजारी करणारी दरवाढ आहे. त्यामुळे शासनाने नोव्हेंबर २०१४ मधील सवलतीचे वीजदर किमान दोन वर्षे स्थिर ठेवावेत. विधानसभा निवडणुकीतील आश्वासन पाळावे. कृषी पंपांना केवळ ८ ते ९ तासच वीज मिळते. परिणामी शेतकरी हैराण झाला आहे. यामुळे त्वरित वीज दरवाढ मागे घ्यावी. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. १८) दसरा चौकातील श्री छत्रपती शाहू शिक्षण संस्था (शाहू मराठा बोर्डिंग) येथे मेळावा होणार आहे. दुपारी १ वाजता मेळाव्याला सुरुवात होईल. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सहकारी पाणीपुरवठा संस्था प्रतिनिधी, शेतकरी यांनी उपस्थित राहावे. यावेळी बाबासाहेब पाटील-भुयेकर, आर. जी. तांबे, चंद्रकांत पाटील, सखाराम चव्हाण, आर. के. पाटील, विक्रांत पाटील-किणीकर, एस. ए. कुलकर्णी, मारुती पाटील उपस्थित होते. किरकोळ विषय... जिल्ह्यातील आमदार, खासदारांना शेतीपंप वीज दरवाढीचा विषय किरकोळ वाटत असतो. त्यामुळे वीज दरवाढीच्या विरोधातील आंदोलनात ते सहभागी होत नाहीत, असा टोला डॉ. पाटील यांनी लगावला.