शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

वीजदरवाढीविरुद्ध मेळावा

By admin | Updated: August 11, 2015 01:09 IST

एन. डी. पाटील : शेतकरी ठरविणार १८ रोजी आंदोलनाची दिशा

कोल्हापूर : शासनाने कृषी पंपांना ४४ पैशांची एकतर्फी दरवाढ केली आहे. या अन्यायी वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १८ आॅगस्टला सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केले. डॉ. पाटील म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून वीज दरवाढीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. मध्यंतरी वीज नियामक आयोगाकडे हरकती दाखल करून बाजूही मांडली. विधानसभेत कृषिपंपांची वीज दरवाढ करणार नसल्याचे ऊर्जामंत्री यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र ७२ पैसे प्रतियुनिट असलेला कृषी पंपाचा वीजदर १ रुपये १६ पैसे केली आहे. तब्बल ४४ पैशांची अन्यायी वीज दरवाढ लादली आहे. ही दरवाढ मुकाटपणे सहन केल्यास पुन्हा भविष्यात शेतकऱ्यांवर वीज दरवाढीचे मोठे संकट येण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या केलेल्या दरवाढीला आमचा कडाडून विरोध आहे. दरवाढीमुळे शेतकरी आर्थिक संकटात येणार आहे. शेतमालाला उत्पादन खर्चावर दर मिळत नसल्याने बळिराजा अडचणीत आहे. उसाचे बिल सात, आठ महिन्यांनंतरही मिळालेली नाहीत. पावसाची वक्रदृष्टी आहे. उभी पिके वाळत आहेत. राज्यात दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दिलासा देण्याऐवजी वीज दरवाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. राज्यातील सर्व कृषी पंपांचे वीजदर शेजारील सर्वच राज्यांपेक्षा दुप्पट, दीडपट आहेत. शेतकऱ्यांनी कर्जबाजारी करणारी दरवाढ आहे. त्यामुळे शासनाने नोव्हेंबर २०१४ मधील सवलतीचे वीजदर किमान दोन वर्षे स्थिर ठेवावेत. विधानसभा निवडणुकीतील आश्वासन पाळावे. कृषी पंपांना केवळ ८ ते ९ तासच वीज मिळते. परिणामी शेतकरी हैराण झाला आहे. यामुळे त्वरित वीज दरवाढ मागे घ्यावी. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. १८) दसरा चौकातील श्री छत्रपती शाहू शिक्षण संस्था (शाहू मराठा बोर्डिंग) येथे मेळावा होणार आहे. दुपारी १ वाजता मेळाव्याला सुरुवात होईल. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सहकारी पाणीपुरवठा संस्था प्रतिनिधी, शेतकरी यांनी उपस्थित राहावे. यावेळी बाबासाहेब पाटील-भुयेकर, आर. जी. तांबे, चंद्रकांत पाटील, सखाराम चव्हाण, आर. के. पाटील, विक्रांत पाटील-किणीकर, एस. ए. कुलकर्णी, मारुती पाटील उपस्थित होते. किरकोळ विषय... जिल्ह्यातील आमदार, खासदारांना शेतीपंप वीज दरवाढीचा विषय किरकोळ वाटत असतो. त्यामुळे वीज दरवाढीच्या विरोधातील आंदोलनात ते सहभागी होत नाहीत, असा टोला डॉ. पाटील यांनी लगावला.