शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

राजू शेट्टी देणार तिसरा पर्याय ?

By admin | Updated: July 9, 2014 01:07 IST

विधानसभा : नाराजांना एकत्रित करणार

विश्वास पाटील / कोल्हापूर शिवसेना-भाजपसह दोन्ही काँग्रेसमधील नाराजांना एकत्र करून विधानसभा निवडणुकीत तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार राजू शेट्टी व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रयत्न आहेत. साखरपट्ट्यातील मातब्बर नेत्यांची एकजूट करून किमान ४५ जागा लढविता येतील का, यासंबंधीची चाचपणी सुरू झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महायुतीला एकत्र बांधून ठेवणारा नेता नसल्याने शिवसेना-भाजपमध्ये अंतर्गत एकमेकांचे पाय ओढण्याचे राजकारण जोरात सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीत युतीला विधानसभेच्या २४५ मतदारसंघांत मताधिक्य मिळाल्याने नेते हवेत आहेत. दोन्ही काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याची भाषा केली जात आहे. शिवसेना-भाजपनेही तसाच शड्डू ठोकला तरी हे दोन्ही पक्ष युतीतर्फे एकत्रच लढणार हे स्पष्ट आहे. परंतु, मुंडे यांच्या निधनानंतर या दोन्ही पक्षांतील जो समन्वयाचा धागा होता तो आता तुटल्याचे महायुतीतीलच नेत्यांनाही जाणवू लागले आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत दुफळी आहेच, शिवाय या दोन पक्षांतील कुरघोडीचे राजकारणही वाढले आहे. त्यामुळेच सांगलीतून भाजपचे नाराज आमदार संभाजी पवार यांच्या मुलाऐवजी नीता केळकर यांना उमेदवारी देण्याचा आग्रह खासदार संजय पाटील यांच्याकडून धरला जात आहे. प्रकाश शेंडगे व सुरेश खाडे यांच्या उमेदवारीवरूनही अशीच रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा निवडणूक वेगळी व विधानसभेचे राजकारण वेगळे असते. कारण विधानसभेला स्थानिक राजकारणाचा रंग असतो. महाराष्ट्राच्या विधानसभेत किमान शंभराहून जास्त आमदार असे आहेत की, गेली वीस वर्षे त्यांच्याच घराण्यात आमदारकी आहे. तेच लोक सरड्यासारखे रंग बदलून सत्ता मिळवतात. हे बदनाम लोक आहेत हे खरे असले तरी त्यांचा पराभव करणेही सोपे नाही. कोल्हापूरपासून लातूरपर्यंत गेली अनेक वर्षे प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात सातत्याने संघर्ष करणारे नेतेही आहेत. त्यांचा महायुती विचार करायला तयार नाही. परंतु, जे दलबदलू आहेत, त्यांना पुन्हा पायघड्या घातल्या जात आहेत. पर्याय चांगला दिला तरच लोक विश्वास ठेवतात. परंतु, प्रत्यक्षात उलटेच घडत असल्याने शेट्टीही नाराज आहेत. साखरपट्ट्यातील हे नेतृत्व थेट शिवसेना-भाजपची उमेदवारी घेण्यास तयार नाही. कारण त्यांची पाळेमुळे दोन्ही काँग्रेसच्या राजकारणात रूजली आहेत. त्यांना स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून असा काही तिसरा पर्याय उपलब्ध झाल्यास त्यांची लढण्याची तयारी आहे. या सगळ््या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्राच्या राजकारणातील चार प्रमुख पक्षांतील नाराज नेत्यांना एकत्र करून काही वेगळेच व्यासपीठ स्थापन करता येईल का, अशा हालचाली सुरू आहेत. ज्यांना दोन्ही काँग्रेसचा कंटाळा आला आहे परंतु शिवसेना-भाजपलाही मतदान द्यायचे नाही, अशा लोकांना हा पर्याय असू शकेल.