शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

शहरात पाऊस पुन्हा ‘सैराट’!

By admin | Updated: June 10, 2016 00:49 IST

रस्त्यावर लोट : नागरिकांची त्रेधातिरपीट; ‘सेफ सिटी’चा धुव्वा; पहिल्या पावसातच स्वच्छतेचे वाजले तीनतेरा

कोल्हापूर : शहरात गुरुवारी रात्री आठनंतर पाऊस पुन्हा सैराट झाला. बुधवारी (दि. ८) सायंकाळप्रमाणेच शहरवासीयांची त्रेधातिरपीट उडाली. या मान्सूनपूर्व पावसाने दिवसभर कार्यालयात काम करून घरी परतणाऱ्या लोकांची चांगलीच पंचाईत केली. बुधवारी सायंकाळी कोल्हापूरसह जिल्ह्यालाही पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. त्यामुळे हाच पाऊस तसाच सुरू राहतो की काय असे वाटत होते; परंतु गुरुवारी सकाळी आभाळ स्वच्छ होते. दिवसभर पावसाची कोणतीही चाहूल नव्हती. फक्त उकाडा जाणवत होता. आता पावसाळा सुरू झाला म्हणून लोकांनी पावसाळ्यातील डागडुजीचीही कामे करून घेतली. आता दोन-तीन दिवस पाऊस येणार नाही, असे वाटत असतानाच रात्री आठनंतर पुन्हा आभाळ भरून आले व जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते. त्यातूनच वाहतूक सुरू राहिली. रेनकोटशिवाय बाहेर पडलेल्या लोकांना चिंब भिजूनच घरी परतावे लागले. पावसामुळे रात्री हवा मात्र थंडगार झाली.शहरातील गटारींतील पाणी नाल्यांद्वारे वाहून जाते; परंतु अनेक ठिकाणचे नाले बांधकाम व्यावसायिकांनी वळविले आहेत. बसंत-बहार टॉकीजजवळचा नाला असाच स्थानिक बिल्डरने वळविला. टेंबलाईवाडी येथील नाला ‘आयआरबी’ने वळविला. अशा घटना घडल्यावर त्याबद्दल महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या; परंतु तेथील यंत्रणेने त्यांची दखल न घेतल्यानेच पहिल्या पावसात शहराचे तळे झाल्याची तक्रार प्रजासत्ताक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. हे नाले तातडीने रिकामे करून पाण्याचा प्रवाहीपणा सुरू करावा, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.