शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

रब्बी हंगाम रखडला; पिकांच्या वाढी खुंटणार

By admin | Updated: December 4, 2014 23:35 IST

आॅक्टोबरमधील पावसाचा परिणाम : रोगांचा होणार प्रादुर्भाव; २५ पैकी १५ हजार हेक्टर क्षेत्रांतच पेरण्या

आयुब मुल्ला - खोची --रब्बी हंगामाला उशीर झाल्याने जिल्ह्यात अद्यापही निम्म्या क्षेत्रावर पिकांची पेरणी झालेली नाही. नैसर्गिक वातावरणातील बदलांच्या परिणामामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी रब्बीचे क्षेत्रही घटले आहे. एक महिना उशिराचा फटका पिकांना बसण्याची चिन्हे असल्याने रोगांचा प्रादुर्भावही वाढणार आहे. एकीकडे या हंगामातील खतांची जय्यत तयारी आहे; पण ती वापरण्यास उठावच होताना दिसत नाही. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र सुमारे २५ हजार हेक्टर इतके आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या शक्यतो पूर्ण होतात; परंतु चालूवर्षी आॅक्टोबर हीटच जाणवली नाही. वास्तविक या कालावधीत सकाळी, संध्याकाळी थंडी, तर दुपारी उन्हाचा तडाखा जास्त असतो; परंतु या मोसमात पावसानेच हजेरी लावल्याने मशागती लांबल्या. मोसम उशिरा सुरू होत गेला. नोव्हेंबरमध्येसुद्धा थंडी वाढली नाही. त्यामुळे पेरण्या वेळात झाल्या नाहीत. ज्या काही प्रमाणात पेरण्या झाल्या, त्यांची वाढ होण्यास अडथळा येत आहे. उशिरा पेरण्या झालेल्या पिकांच्या पानांची, खोडांची वाढ खुंटली आहे. अद्यापही गव्हाची पेरणी सुरू आहे. हरभरा, ज्वारी, मका या पिकांची काही प्रमाणातच पेरणी झाली आहे. या पिकांसह उसाच्या भरणीसाठी लागणारी खते मात्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मार्चपर्यंत पावणेदोन लाख टन खतांचा पुरवठा होईल, असे नियोजन शासकीय यंत्रणेने केले आहे; परंतु सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या हंगामातच सलगता नसल्याने खतांचा उठाव झालेला नाही.आतापर्यंत १५ हजार हेक्टर क्षेत्रांवरच पेरण्या झाल्या आहेत. अद्यापही ४० टक्के क्षेत्र तसेच आहे. ते तसेच राहण्याची शक्यता आहे. कारण यापुढे जर पेरण्या केल्या, तर जानेवारीत करपा, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोट्यातील शेती करण्यापेक्षा अन्य पर्यायी पिकांच्या विचारात शेतकरी आहे.काही प्रमाणात पडणाऱ्या धुक्याच्या द्राक्ष पिकांवर मात्र परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे चालू रब्बी हंगाम नैसर्गिक अवकृपेमुळे एक महिना उशिरा पुढे गेला अन् तो फायदेशीर सोडाच, शेतकऱ्यांना अन्य पिकांकडे वळविणारा ठरला आहे. त्यामुळे शासनाचा व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आता रब्बी हंगामातील उरल्यासुरल्या उपायांबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीविषयक प्रबोधन करेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. उसाला चांगला दर मिळण्याची आशा लावून असलेला शेतकरी मार्चपर्यंत उसाकडे लक्ष देईल, अशी स्थिती आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा चाऱ्यासाठीच अधिक उपयोग करता येईल. मोहर सुटण्याच्या अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांनाही सध्याच्या वातावरणाचा फटका बसणार आहे. मात्र, भरणी केलेल्या ऊस लागणींना या पावसाचा फायदा झाला असून, उसाची वाढ जोमाने होईल.- सुरेश मगदूम, तालुका कृषी अधिकारी