शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विभागाचा प्रश्न लटकला

By admin | Updated: July 13, 2015 00:34 IST

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा प्रश्न : महासंघाच्या माध्यमातून ३० वर्षांचा लढा; शासनाचे दुर्लक्ष

संतोष मिठारी - कोल्हापूर -समितीची स्थापना, अभ्यासगटाची शिफारस होऊनदेखील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या स्वतंत्र विभागाचा प्रश्न अद्यापही रखडलेला आहे. विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीचा पर्याय असलेल्या संबंधित विभागाच्या स्थापनेसाठी कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांचा गेल्या ३० वर्षांपासून लढा सुरू आहे.जुनी अकरावी १९७६मध्ये बंद झाली. यावेळी ज्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जुनी अकरावी होती, तेथे बारावी सुरू करण्यास तसेच प्री-डिग्री असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयांत बारावी सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली. यात हायस्कूल आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची विभागणी झाली. त्यामुळे विद्यार्थीसंख्या, तासिकांची वेळ, शिक्षकांची पदे यांच्यात असमानता निर्माण झाली. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर झाला. त्यावर गेल्या ३० वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने हायस्कूल आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अडकलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या कामकाजात एकजिनसीपणासाठी स्वतंत्र विभागाची मागणी केली. शासनाच्या शिक्षण विभागाला निवेदने दिली, चर्चा केली. आंदोलनाचा जोर वाढल्याने शासनाने वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांना माध्यमिक शाळा संहिता लागू केली. मात्र, स्वतंत्र विभागाचा प्रश्न ‘जैसे थे’ राहिला. त्यानंतर स्वतंत्र विभागासाठी महासंघाचा लढा सुरूच राहिला. याबाबतची महासंघाची सकारात्मक भूमिका लक्षात घेऊन तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने स्वतंत्र विभाग स्थापनेसाठी पाचसदस्यीय समिती स्थापन केली. समितीच्या दोन बैठका झाल्या. मात्र, त्यानंतर सरकार बदलल्याने पुढील कार्यवाही ठप्प झाली. नव्या भाजप-शिवसेना सरकारला स्वतंत्र विभागासह विविध प्रलंबित प्रश्नांची माहिती व्हावी यासाठी महासंघाने एक वर्षाची मुदत दिली. त्यानंतर सरकारकडून आश्वासने मिळाली. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाही काहीच झाली नाही. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी स्वतंत्र विभागाची स्थापना महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.विभाग केल्यास बोजा पडणार नाही...तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित अशा एकूण ७ हजार ५०० कनिष्ठ महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विभाग स्थापनेबाबत समिती स्थापन केली. तिच्या दोन बैठका झाल्या असल्याचे कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे सचिव प्रा. ए. एस. तळेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, समितीच्या अभ्यासगटाने राज्यातील चार हजार कनिष्ठ महाविद्यालयांसाठी प्राचार्य व शिक्षकेतर संवर्गातील पदे नेमावी लागणार असल्याचा शेरा दिला आहे. मात्र, चार हजारांपैकी प्रत्यक्षात महाविद्यालयांमध्ये दोन हजार प्राध्यापक हे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांना निव्वळ पदोन्नती द्यावी लागणार आहे. उरला प्रश्न शिक्षकेतर संवर्गातील पदांचा. संबंधित पदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असून, ती निव्वळ वर्ग करावी लागणार आहेत. त्यामुळे विभाग केल्यास त्याचा बोजा शासनावर पडणार नाही. शिवाय महाविद्यालयीन शिक्षणातील अकरावी आणि बारावीचा पाया भक्कम होईल.