शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या आडून सहकारी संस्थांच्या स्वायत्तेवर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:22 IST

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने पाच वेळा लांबणीवर टाकल्याने संस्था सभासदांमधून ...

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने पाच वेळा लांबणीवर टाकल्याने संस्था सभासदांमधून सरकारच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त होत आहे. लाखो मतदार असलेली विधान परिषद, ग्रामपंचायत, महापालिकांच्या निवडणुका घेतात, मग सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सरकार घाबरते का? कोरोनाच्या आडून संस्थांच्या स्वायत्तेवर घाला घातला जात असून, हा एक प्रकारे पोरखेळ सुरू आहे.

सहकार कायद्यानुसार संचालक मंडळाची मुदत पाच वर्षे असते, तत्पूर्वी निवडणूक प्रक्रिया राबवून नवीन संचालक अस्तित्वात येणे बंधनकारक आहे. मात्र आपत्तीच्या काळात निवडणुका पुढे ढकलता येतात. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली, त्याच्या कामासाठी विकास संस्था व जिल्हा बँकांच्या निवडणुकांना स्थगित देण्यात आली. त्यानंतर चारच दिवसात सर्वच संस्थांच्या निवडणुका १८ मार्चपर्यंत लांबणीवर टाकल्या. तोपर्यंत कोरोनाचे संकट आल्याने सरकारने तीन-तीन महिन्याच्या मुदतवाढ दिल्या. ऑक्टोबरनंतर कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने सरकारने विधान परिषद निवडणुका घेतल्याने संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला होता. डिसेंबर २०२०अखेर मुदतवाढ संपल्यानंतर सहकार प्राधिकरणाने निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली होती. तोपर्यंत शनिवारी सरकारने ३१ मार्च २०२१पर्यंत पुन्हा निवडणुका लांबणीवर टाकल्या. या पोरखेळ म्हणजे संस्थांच्या स्वायत्तेवर घाला असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

नामांतर, मंत्र्यांवरील आराेपाची भीती?

औरंगाबादचे नामांतराचा विषय मराठवाड्यात धुमसत आहे. याबाबत आघाडी सरकारमध्येच एकवाक्यता नाही. त्यातच मंत्र्यांच्यावरील आराेपामुळे सरकारला बचावात्मक स्थितीतून जावे लागत आहे. अशा वातावरणात संस्थांच्या निवडणुका नको, असा एक मतप्रवाह मंत्रिमंडळात आहे. त्यातूनच निवडणुका लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे.

राजकीय गणिते जमल्यानंतरच निवडणुका

ग्रामपंचायतीपाठोपाठ आता नवी मुंबई, कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. नवी मुंबईत अद्याप लोकल सुरू नसल्याने निवडणुकांबाबत सरकार सावध भूमिका घेत आहे. त्यात जिल्हा बँकांसह इतर संस्थांच्या निवडणुकांच्या राजकारणामुळे आघाडी सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होऊ नये, ही भीती सरकारला आहे. ही सर्व राजकीय गणिते जमल्यानंतरच निवडणुका घेतल्या जाणार हे निश्चित आहे.

निवडणुका हव्या तर न्यायालयत जा

सरकार निवडणुका घेत नसल्याने अस्वस्थता आहे. सध्या न्यायालयाने आदेश दिलेल्या ३८ संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे आता निवडणुका पाहिजे तर न्यायालयातच जावे लागेल, अशी भावना सामान्य माणसाची झाली आहे.

कोट-

निवडणुकांसाठी न्यायालयात जावे लागत असेल तर राज्यातील सरकारच्या अस्तित्वासमोरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हुकुमशाही म्हणून टीका करणाऱ्यांची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे.

- संपतराव पवार-पाटील (सदस्य, राज्य चिटणीस मंडळ, शेकाप)