शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

भात खरेदी केंद्राला ‘ब्रेक’

By admin | Updated: November 27, 2014 00:11 IST

हमीभावही कमी : उत्पादकांच्या हाती कोंडाच, गतवर्षीपेक्षा अल्प प्रतिसाद

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर --जिल्ह्यात भात खरेदी केंद्र सुरू करण्याला अडथळ्यांचा ब्रेक लागत आहे. परिणामी, व्यापाऱ्यांच्या लूटमारीला बळी पडून भात उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती ‘कोंडा’च शिल्लक राहत आहे. तालुका पातळीवरील बाजार समिती, कृषिसंबंधी संस्था, खरेदी-विक्री संघ केंद्र सुरू करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. खरीप हंगामात शाहूवाडी, चंदगड, पन्हाळा, राधानगरी, आजरा या भागांत भात पीक अधिक असते. यंदा भाताचा हमीभाव १३६० रुपये प्रतिक्विंटल आहे; पण व्यापारी ८०० ते ११५० रुपये अशा दराने ते खरेदी करीत आहेत. वजनकाट्यातही फेरफार करून फसवणूक केली जात आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यामुळे शासनाकडूनच १ नोव्हेंबरपासून भातपट्ट्यामध्ये खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश मार्केटिंग फेडनरेशनला देण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेवेळी जिल्हाधिकारी यांनी भात खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश दिला आहे; पण प्रत्यक्षात केंद्र सुरू करताना अनेक अडचणी येत आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करूनही केंदे्र चालू होत नाहीत.गेल्यावर्षी जिल्ह्यातील दोन केंद्रांत फक्त एक हजार २२ क्विंटल भात संकलित झाले होते. यशवंतनगर येथे चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाने भात खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रात ८०० क्विंटल भातखरेदी झाली. बांबवडे (ता. शाहूवाडी) तालुका खरेदी-विक्री संघातर्फे सुरू केलेल्या केंद्रात १४७ क्विंटल भात खरेदी केले. हमीभावाप्रमाणे पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. खरेदी केलेल्या भाताचे तांदूळ करून जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात दिले; परंतु, केंद्रात शेतकऱ्यांना भात देण्यासाठी भातपिकाची नोंद असलेला सातबारा दाखविणे बंधनकारक आहे. स्वच्छ, चांगला वाळलेला, आर्द्रता कमीची अट, केंद्रापर्यंतची करावी लागणारी वाहतूक यांमुळे शेतकरी दारात आलेल्या व्यापाऱ्यास आपला भात देणे पसंत करतो. भात अधिक पिकणाऱ्या तालुक्यात केंद्र सुरू करण्यासंबंधी पत्रव्यवहार केला आहे; पण यशवंतनगर वगळता कोणाकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही. गोडावून नसणे, कमिशन कमी असणे, आदींमुळे केंद्र सुरू करण्याकडे तालुका, खरेदी-विक्री संघ दुर्लक्ष करीत असतात. केंद्रावर भात दिल्यास पैसे बँक खात्यावर जमा होतात. वाहतूक स्वत: करावी लागते. सात-बारा बंधनकारक आहे. आर्द्रता कमी असावी लागते, या कारणांमुळे शेतकरी भात विक्री केंद्राकडे पाठ फिरवितो.- एम. एम. पाटील, फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारीखुल्या बाजारापेक्षा हमीभाव कमी मिळतो. हमीभावासंंबंधी बहुतांश शेतकरी अनभिज्ञ आहे. गरजेवेळी व्यापाऱ्यांकडून उत्पादकाने पैसे घेतलेले असतात. या मोबदल्यात भात त्या व्यापाऱ्यास विकला जातो. यामुळे केंद्रांना कमी प्रतिसाद मिळतो. हमीभाव वाढवून जाचक अटी शिथिल केल्यास शेतकरी केंद्रात भात देण्यास तयार आहे.- नितीन पाटील, बेळेभाट, ता. चंदगड, भात उत्पादक शेतकरी)हमीभाव कमी असल्याने उदासीनतायंदा महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडतर्फे केंद्र सुरू करण्यासाठी आठवड्यापूर्वी बाजार समिती, खरेदी-विक्री संघांना पत्र दिले आहे. मात्र, यशवंतनगर वगळता सर्व बाजार समित्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही. तसेच हमीभावच कमी असल्याने केंद्रासंबंधी शेतकरीही आग्रही नाही.