शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

महापुरातील सर्व नुकसानाचे पंचनामे आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:25 IST

जिल्ह्यात २० ते २४ तारखेदरम्यान झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे नुकसान, घरे, दुकानांचा पडझड, जनावरे वाहून जाणे, व्यावसायिकांनी दुकानांमध्ये ...

जिल्ह्यात २० ते २४ तारखेदरम्यान झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे नुकसान, घरे, दुकानांचा पडझड, जनावरे वाहून जाणे, व्यावसायिकांनी दुकानांमध्ये भरलेल्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे जिल्ह्यातील ४११ गावांना फटका बसला असून, ३७७ गावं काही प्रमाणात व ३४ गावं पूर्ण बाधित झाली आहेत. सात नागरिकांचा मृ्त्यू झाला असून, १०४ जनावरांनाही महापुराने आपल्या कवेत घेतले आहे. या सगळ्या नुकसानाची अंदाजे रक्कम २४३ कोटी ३५ लाखांवर गेली आहे. करवीर आणि शिरोळ तालुक्यात या नुकसानाचे प्रमाण अधिक आहे.

सध्या पुराचे पाणी ओसरत असल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारपासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शेतीतील नुकसानाचे पंचनामे हा यातील महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय घरे, दुकानांमधील माल, अन्य मालमत्ता, जनावरांचा मृत्यू, प्रापंचिक साहित्याचे नुकसान या सगळ्याचे पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयाकडून नियुक्ती करण्यात आली असून, भागनिहाय तलाठी, लिपीक, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

----

जागेवर जावून व्हावेत पंचनामे

दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरानंतर करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये ज्यांचे नुकसान झालेले नाही, अशा लोकांची नावेही घालण्यात आली होती. शिरोळ आणि करवीर तालुक्यात ही बोगसगिरी जास्त प्रमाणात झाली होती. न्यायालयापर्यंत प्रकरण जावून संबंधितांकडून वसुली करण्यापर्यंतचे प्रकार झाले. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही याचा ठपका बसला. दुसरीकडे अजूनही काही पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जावून पारदर्शक पंचनामे करण्यात यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

----