शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महापुरातील सर्व नुकसानाचे पंचनामे आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:25 IST

जिल्ह्यात २० ते २४ तारखेदरम्यान झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे नुकसान, घरे, दुकानांचा पडझड, जनावरे वाहून जाणे, व्यावसायिकांनी दुकानांमध्ये ...

जिल्ह्यात २० ते २४ तारखेदरम्यान झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे नुकसान, घरे, दुकानांचा पडझड, जनावरे वाहून जाणे, व्यावसायिकांनी दुकानांमध्ये भरलेल्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे जिल्ह्यातील ४११ गावांना फटका बसला असून, ३७७ गावं काही प्रमाणात व ३४ गावं पूर्ण बाधित झाली आहेत. सात नागरिकांचा मृ्त्यू झाला असून, १०४ जनावरांनाही महापुराने आपल्या कवेत घेतले आहे. या सगळ्या नुकसानाची अंदाजे रक्कम २४३ कोटी ३५ लाखांवर गेली आहे. करवीर आणि शिरोळ तालुक्यात या नुकसानाचे प्रमाण अधिक आहे.

सध्या पुराचे पाणी ओसरत असल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारपासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शेतीतील नुकसानाचे पंचनामे हा यातील महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय घरे, दुकानांमधील माल, अन्य मालमत्ता, जनावरांचा मृत्यू, प्रापंचिक साहित्याचे नुकसान या सगळ्याचे पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयाकडून नियुक्ती करण्यात आली असून, भागनिहाय तलाठी, लिपीक, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

----

जागेवर जावून व्हावेत पंचनामे

दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरानंतर करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये ज्यांचे नुकसान झालेले नाही, अशा लोकांची नावेही घालण्यात आली होती. शिरोळ आणि करवीर तालुक्यात ही बोगसगिरी जास्त प्रमाणात झाली होती. न्यायालयापर्यंत प्रकरण जावून संबंधितांकडून वसुली करण्यापर्यंतचे प्रकार झाले. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही याचा ठपका बसला. दुसरीकडे अजूनही काही पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जावून पारदर्शक पंचनामे करण्यात यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

----