शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जुलैमध्ये आलेल्या महापुराने नुकसान झालेल्या शेतीच्या पंचनाम्याचे काम सोमवारी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जुलैमध्ये आलेल्या महापुराने नुकसान झालेल्या शेतीच्या पंचनाम्याचे काम सोमवारी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. सुमारे ७१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडून दोन दिवसांत व्यक्तिनिहाय पंचनामे कृषी विभागाकडे सादर केले जाणार आहेत. त्यानंतर त्याची छाननी करून कृषी आयुक्त व विभागीय आयुक्तांकडे पाठविले जाणार आहेत.

महापूर व अतिवृष्टीने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाच्यावतीने नुकसान झालेल्या शेती व पिकांचे पंचनामे करण्यात आले. गेली तीन आठवडे पंचनाम्याचे काम गावपातळीवर सुुरू होते. जिल्ह्यात साधारणत: ७० हजार हेक्टर क्षेत्र हे पूरबाधित आहे. गाव पातळीवर तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी पंचनामे केले आहेत. सोमवारी पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. संबंधित यंत्रणेकडून तालुका पातळीवर नुकसानग्रस्तांच्या याद्या पाठविल्या जाणार आहेत. तालुका पातळीवरून कृषी विभागाकडे याद्या येतील, त्याचे एकत्रिकरण केले जाईल. त्यानंतर कृषी विभाग छाननी करणार आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने कृषी आयुक्त व विभागीय आयुक्तांकडे याद्या पाठविल्या जाणार आहेत. येथून मदत व पुनर्वसनाकडे भरपाईच्या रकमेची मागणी केली जाते. या सगळ्या प्रक्रियेला किमान महिन्याचा कालावधी जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात मदतीची रक्कम पडण्यास ऑक्टोबर उजाडेल, असा अंदाज आहे.

गावनिहाय छाननी होणार

तालुका पातळीवरून आलेल्या याद्यांची गावनिहाय छाननी होणार आहे. यामध्ये त्या गावात पडलेला पाऊस, पुराच्या पाण्याची पातळी व अधिकाऱ्यांनी केलेला पंचनामा याची छाननी कृषी विभागामार्फत केली जाणार आहे.

कोट-

पुराचे पाणी, दलदलीमुळे सुरुवातीच्या टप्प्यात पंचनाम्यात अडथळे आले. सोमवारी पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन-तीन दिवसांत छाननी करून यादी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविली जाईल.

- ज्ञानदेव वाकुरे (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)