शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रोटोकॉल’ सुरक्षेचा की नेत्यांच्या अपमानाचा?

By admin | Updated: October 26, 2015 00:22 IST

उजळाईवाडी विमानतळ : नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान वाद नित्याचेच; ठोस धोरण ठरविणे गरजेचे

कोल्हापूर : उजळाईवाडी विमानतळावर प्रवेश देताना पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणांवरून राजकीय नेत्यांना मिळणारी वागणूक खूपच वादग्रस्त ठरत असून त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनाही मोठ्या अपमानास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विमानतळावर नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान वादावादीचे प्रसंग नित्याचेच बनले आहेत. त्यात पोलीस अधिकारी अनेक नेत्यांना ओळखतच नसल्याने त्याचाही फटका या नेत्यांना बसत आहे. रविवारी महापालिका निवडणुकीचा सुपर संडे असल्याने कोल्हापुरात जाहीर प्रचार सभांसाठी अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. या नेत्यांच्या स्वागतास विमानतळावर दिवसभर गर्दी होती. सकाळी पावणेदहा वाजता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या स्वागतासाठी विमानतळावर कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यामध्ये कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.सुरुवातीला सर्वच नेते विमानतळ इमारतीच्या मुख्य दरवाजासमोर उभे होते. मात्र, विमानाचे ‘लॅँडिंग’ झाल्यावर सर्वप्रथम महादेवराव महाडिक आत गेले. त्यांना दबकतच अडविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी कोण अडविणार? असा प्रश्न करताच पोलीस यंत्रणा हबकली. त्यांच्यापाठोपाठ अनेक नेतेमंडळी आत जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने गोंधळ उडाला. विमानतळात प्रवेश करताना अनेक दिग्गज नेत्यांना पोलिसांकडून ढकलण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील पडता पडता वाचले. त्यामुळे त्यांनी आत न जाताच लांबच राहणे पसंत केले. शेवटी महाडिकांनी त्यांना बाहेर येऊन पुन्हा आत नेले. पोलिसांकडून दिग्गज नेत्यांना होणारी अशी वागणूक पाहून जि. प.चे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह अनेक नेत्यांनी बाहेरच राहणे पसंत केले. दरम्यान, महादेवराव महाडिक व प्रकाश आवाडे यांनी दारात उभे राहून आपल्या निवडक कार्यकर्त्यांची नावे पुकारत त्यांना आत घेतले. हा गोंधळ सुरू असतानाच सकाळी साडेआठ वाजल्यापासून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या स्वागतास उपस्थित असलेल्या उजळाईवाडीच्या सरपंच कॉँग्रेसच्या कार्यकर्त्या स्मिता आंबवडे यांनी आत जाण्याची विनंती केली असता पोलीस अधिकारी दिलीप जाधव यांनी त्यांना बाहेर उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर पत्रकारांनी तसेच कार्यकर्त्यांनी जाधव यांना त्या या परिसरातील प्रथम नागरिक असल्याचे सांगून समजाविण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी आम्ही शासनाचा पगार घेतोय, कोणाला आत सोडायचे तुम्ही आम्हाला शिकविण्याची गरज नाही, अशी उद्धट भाषा वापरली. त्यामुळे आंबवडे या घरी परत जाण्यास निघाल्या असता पुन्हा जाधव यांनी त्यांना बोलवून घेऊन आत नेले. या साऱ्या प्रकारांमुळे विमानतळाची सुरक्षा व्यवस्था व लोकप्रतिनिधींना दिली जाणारी वागणूक हा मुद्दा ऐरणीवर आला. विमानतळाची सुरक्षा महत्त्वाचीच आहे. यामध्ये कोणाचेच दुमत नाही, पण लोकप्रतिनिधींचे तसेच मान्यवरांचा सन्मान राखणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे भान राखणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाली. हे करता येईल?मंत्र्यांचे दौरे हे पूर्वनियोजित असल्याने त्यांच्या स्वागतास येणाऱ्या स्थानिक नेत्यांची व मान्यवरांची यादी अगोदरच नोंदवून घेता येईल.स्थानिक नेत्यांना व मान्यवरांना ओळखणारा एखादा पोलीस अधिकारी या ठिकाणी असणे आवश्यक आहे.विमानतळात प्रवेशासाठी एकच धोरण अवलंबिणे आवश्यक आहे. एक तर कोणालाच प्रवेश देऊ नये किंवा देणे अपरिहार्यच असल्यास अगोदरच मान्यवरांना पूर्ण तपासणी करून आत प्रवेश द्यावा.पोलीस अधिकाऱ्यांनीही अडवणूक करताना किंवा बोलताना सौजन्याचे भान ठेवूनच वागणूक देणे गरजेचे आहे.नेत्यांनीही विमानतळाच्या सुरक्षेस बाधा येईल व अधिकाऱ्यांना प्रोटोकॉल सांभाळण्यात अडचण येईल असे वर्तन करु नये.