शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

सावरवाडी येथे तुळशी नदीपात्रातील संरक्षक कठडा कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST

सावरवाडी : जिल्हा परिषदेने ३५ वर्षांपूर्वी बांधलेला सावरवाडी (ता. करवीर) येथील तुळशी नदीपात्रातील संरक्षक कठडा कोसळल्याने ...

सावरवाडी : जिल्हा परिषदेने ३५ वर्षांपूर्वी बांधलेला सावरवाडी (ता. करवीर) येथील तुळशी नदीपात्रातील संरक्षक कठडा कोसळल्याने मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक धोकादायक बनली आहे. संरक्षक कठड्याचे नव्याने बांधकाम करण्याकडे मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यानंतर संरक्षक कठड्याचे बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गावच्या तिन्हीही बाजूंनी तुळशी नदी वाहते. पूर्व पश्चिम आरे - सावरवाडी गावांना जोडणारा मुख्य वाहतुकीचा रस्ता आहे. या रस्त्यानजीक तुळशी नदीचे पात्र आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने ३५ वर्षांपूर्वी संरक्षक कठड्याची उभारणी केली होती. मात्र, या संरक्षक कठड्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे.

तुळशी नदीपात्रात पुराच्या पाण्याचा प्रवाह जादा असल्यामुळे संरक्षक कठड्यावर पाण्याचा जादा दाब पडतो. संरक्षक कठड्याचा पृष्ठभाग अत्यंत खराब झाल्याने कठड्याच्या मधील काही भाग गतवर्षी कोसळला होता. जून महिन्यात झालेल्या पहिल्या पावसामुळे पृष्ठभागाची पडझड होऊन संरक्षक कठड्याचा उर्वरित भाग कोसळल्याने या मार्गाने ग्रामीण भागातील होणारी अवजड वाहतूक धोकादायक बनली आहे.

तुळशी नदीपात्रातील संरक्षक कठड्याचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून होत असून, शासकीय निधीअभावी कठड्याचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे जनतेतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

फोटो ओळ = सावरवाडी (ता. करवीर) येथील तुळशी नदीपात्रातील संरक्षक कठडा कोसळल्याने मुख्य रस्त्यावरून होणारी वाहतूक धोकादायक बनली आहे.