शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

शेतकऱ्यांची सुरक्षाही महत्त्वाची

By admin | Updated: November 11, 2014 00:12 IST

राजू शेट्टी : अमेरिकन दुतावासास सदिच्छा भेट

जयसिंगपूर : भारतात सरकारने गरिबांना अन्नसुरक्षा लागू केली आहे. उपासमारीकडे पाहिल्यास ही काळाची गरज बनली आहे. मात्र, देशातील शेतकऱ्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असल्याचे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. दिल्लीस्थित अमेरिकन दुतावासास सदिच्छा भेट दिली, यावेळी ते बोलत होते, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.नुकतेच देशातील खासदारांचे शिष्टमंडळ अमेरिकन सरकारच्या आमंत्रणावरून अमेरिकेच्या भेटीला गेले होते. त्यानंतर दिल्लीस्थित अमेरिकन दुतावासातील राजदूत श्रीमती कॅथरिने स्टेपन्स व शेती विभागाचे सदस्य अलान मस्टर्ड यांनी सस्नेह भोजनाचे आयोजन केले होते. यावेळी देशातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.खा. शेट्टी म्हणाले, देशातील १३० कोटी जनतेचे पोट भरण्याचे काम शेतकरीवर्ग करतो आहे. देशात जवळपास २७ टक्के लोक उपाशीपोटी राहतात. त्यांच्या सुरक्षेसाठी अन्नसुरक्षा लागू केली आहे. गरिबांच्या दृष्टीने हे चांगले असले तरीही १३० कोटी लोकांचे पोट भरणारा शेतकरी आजही उपेक्षित राहिलेला आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना सरकारला राबवाव्या लागतील. तरच शेतकरी टिकणार आहे. शेतीमालाला योग्य दर मिळणे ही काळाची गरज बनलेली आहे. शेतीमालाला मिळणारा कमी हमीभाव, अवेळी पडणारा पाऊस, शेतकऱ्यांना न मिळणारी योग्य बाजारपेठ या कारणांनी देशातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर सरकारने वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. यावेळी भारतातील अमेरिकेचे राजदूत खासदार अनंतकुमार हेगडे, भाजपचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम रूपाला, भारतीय जनता किसान मोर्चाचे राष्ट्रीय सचिव सगुणकर राव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)हमी भाव द्यावाशेतीमालाला हमीभाव मिळावा१३० कोटी लोकांचे पोट भरणारा शेतकरी आजही उपेक्षित शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने वेळीच उपाययोजना राबविल्या तरच शेतकरी टिकेलबाजारपेठ उपलब्ध करुन द्यावी देशातील केवळ २७ टक्के लोकांसाठी अन्न सुरक्षा कायदा