शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

कोल्हापुरातील प्रचारतोफा आज थंडावणार

By admin | Updated: February 19, 2017 00:55 IST

शेवटच्या टप्प्यात ईर्ष्या टोकाला : साम, दाम, दंडाचा सर्रास वापर

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या प्रचाराची रणधुमाळी आज, रविवारी थंडावणार आहे. रात्री बारापर्यंत उघड प्रचार करण्यास मुभा असल्याने दिवसभर धडाका राहणार आहे. मतदानासाठी अवघे दोन दिवस राहिल्याने उमेदवारांमधील ईर्ष्या टोकाला पोहोचली असून, सर्वच मतदारसंघांत साम, दाम, दंडाचा सर्रास वापर सुरू झाला आहे. गेले पंधरा दिवस ग्रामीण भागांत प्रचाराचा धुरळा उडाला आहे. या वेळेला बहुतांश मतदारसंघांत बहुरंगी लढती होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एखादी बंडखोरीही महागात पडू शकते; त्यामुळे पहिल्या दोन क्रमांकांच्या उमेदवारांनी कमालीची सावधानता बाळगली आहे. मतदानासाठी दोनच दिवस राहिल्याने मतदारांना आकर्षित करण्याचे सर्व मार्ग अवलंबले जात आहेत. जेवणावळींबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल पाहावयास मिळत आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात आल्याने उमेदवारांना मतांचा अंदाज आला आहे. कोणत्या गावात आपण कमी पडणार, याचे आडाखे बांधले जात आहेत. त्यानुसार मतांच्या जोडणीसाठी वाटेल ती ‘किंमत’ मोजण्याची उमेदवारांची तयारीही दिसत आहे. गटांची फोडाफोडी सुरू आहेच; पण त्याबरोबर पै-पाहुण्यांच्या माध्यमातून घराघरांतील मतदान आपणाला करण्याची रणनीतीही आखली जात आहे. आज, रविवार असल्याने रात्री बारापर्यंत प्रचारात घालविण्याचे उमेदवारांचे प्रयत्न आहेत. उन्हाचा तडाखा सुरू झाल्याने सकाळी सात ते दुपारी दीड व सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत गाठीभेटी सुरू आहेत. सुटीचा फायदा घेत बाहेरगावी असलेल्या मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे नियोजनही केले जात आहे. मंगळवारी मतदारांना ने-आण करण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करताना अडचणी येत आहेत. बुकिंग करण्यास सगळ्यांनीच सुरुवात केल्याने एवढ्या गाड्या आणायच्या कोठून? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गाव सांभाळा!मंडळातील तरुण कार्यकर्त्यांना सांभाळताना उमेदवारांसह कार्यकर्त्यांची दमछाक उडत आहे. त्यांच्या मागण्या जास्त असल्या तरी थोडीशी पूर्तता करून त्यांना खूश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांना आपापली गावे सांभाळण्याचा सल्ला नेत्यांनी दिला आहे. नेत्यांकडूनही तंबीमतदानाचा दिवस आला तरी गटा-तटांतील रुसवा-फुगवा जात नसल्याने थेट नेत्यांनाच पाचारण केले जात आहे. मनधरणी करूनही रुसवा निघाला नाही तर थेट तंबी देऊन मतपरिवर्तन करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहेत.दादांची आज वडणगेत सभापालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आज, रविवारी सायंकाळी पाच वाजता वडणगे (ता. करवीर) येथे सभा आयोजित केली आहे. ‘करवीर’मध्ये मंत्री पाटील यांची पहिलीच सभा होत आहे.