शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आघाडी सरकारमुळे रखडला प्रकल्प

By admin | Updated: July 15, 2014 00:29 IST

लोकप्रतिनिधींचे प्रयत्न तोकडे : भ्रष्टाचारावरही पांघरुण; प्रकल्पही अर्धवटच

विश्वास पाटील - कोल्हापूर , तीन आमदारांच्या व्यक्तिगत पातळीवर काही प्रयत्न झाले तरी हा कोल्हापूर जिल्ह्याचा प्रकल्प म्हणून सगळ््यांनी संघटित प्रयत्न न केल्याने धामणी धरणाचे काम इतकी वर्षे भिजत पडले आहे. या धरणाचे कार्यक्षेत्र राधानगरी, करवीर व पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांशी संबंधित आहे. परंतु या मतदारसंघांतील आमदारांनी व तत्कालीन खासदारांच्या पातळीवरही प्रकल्पाच्या कामाला जोर देता आलेला नाही. प्रकल्पाची सुधारित मान्यताच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे जलसंपदा खात्याचा कारभार असूनही आमदार के. पी. पाटील या प्रकल्पासाठी काहीच करू शकलेले नाहीत, हे वास्तव आहे. सरकारने या प्रकल्पातील भ्रष्टाचाराचीही चौकशी केली नाही व धरणाचे कामही रखडले या दोन्ही गोष्टी राज्यातील काँग्रेस आघाडीचे सरकारच जबाबदार आहे. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असताना या धरणास मंजुरी मिळाली. त्यावेळी तत्कालीन आमदार संपतराव पवार यांनी त्यासाठी बराच पाठपुरावा केला होता. त्यांची दोन टर्म प्राथमिक मंजुरी मिळवण्यातच गेली. त्यानंतर पी. एन. पाटील हे आमदार झाले. परंतु त्यांच्या काळात प्रकल्प वनविभागाच्या मंजुरीच्या कचाट्यात अडकला. २००९ मध्ये कामास चांगली गती मिळाली परंतु तोपर्यंत २००९ ला त्यांचा पराभव झाला. पुढे चंद्रदीप नरके आमदार झाले. इतकी वर्षे धरणाचे काम अर्धवट राहण्यात काही महत्त्वाची कारणे आहेत. त्यातील सगळ््यात महत्त्वाचे कारण या धरणाच्या बुडित व लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांचा राजकारण्यांवर दबाव नाही. त्यांची संख्या मर्यादित आहे. परवाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचे ठरविले व परत त्यांनीच तो मागेही घेतला. तीन आमदारांचे कार्यक्षेत्र असल्याने लोकांतही मजबूत संघटन नाही. तीनपैकी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके हे विरोधी पक्षाचे. परंतु त्यांना विधानसभेत सरकारने दादच लागू दिली नाही. धामणी धरणाचा प्रश्नही लागू नये, अशी व्यवस्था पाटबंधारे खात्याकडून विधान मंडळ सचिवालयात पैसे देऊन केली जात होती, असाही अनुभव त्यांना आला. आमदार विनय कोरे व आमदार के. पी. पाटील हे सत्तारुढ गटाचे आमदार. त्यामुळे त्यांची जबाबदारी निश्चितच जास्त होती परंतु तोपर्यंत प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या (सुप्रमा)फेऱ्यात अडकल्याने कागदी घोडे नाचविण्यापेक्षा ते काहीच करू शकले नाहीत. आजही या प्रकल्पास सुधारित मान्यता नाही. त्यामुळे निधी मंजूर होत नाही. चौदा वर्षे प्रकल्प रखडल्यावर त्या परिसरातील शेतकऱ्यांनी स्वत:चा मार्ग शोधला. सिंचनासाठी हे लोक स्वखर्चाने दहा ते अकरा ठिकाणी मातीचे बंधारे घालतात. त्यासाठी दोन-तीन लाख रुपये खर्च करतात. पावसाळ््यात ते फोडून दिले जातात. त्यामुळे नदी उथळ होत आहे. पाण्यातील जलचरांवरही त्याचा परिणाम झाला आहे परंतु त्याची फिकीर कुणाला नाही. धरण झाले असते, शेती पाण्याखाली असती तर अर्थकारण सुधारले असते. परंतु आज या भागातील गोरगरिब माणूस सेंट्रिंगच्या कामावर जातो. कोकणात लाकूडतोड करतो. गुऱ्हाळघरांवर काम करतो. त्याच्या कंबरेची लंगोटी अजून गेली नाही. गरिबीमुळे व्यसनाधीनता वाढली, असे अनेक प्रश्न त्यातून निर्माण झाले आहेत. परंतु त्याच्या सोडवणुकीचा कोणताच कृती आराखडा सरकारकडे आज तरी नाही.बाबमूळ तरतूदसुप्रमा तरतूदवाढएकूण वाढीशी टक्केवारी१दरसूचीतील वाढ९६.०९२८९.२६१९३.१७ २९.१७२भूसंपादन,पुनर्वसन,२.३१५४.१८५१.८७७.८३वन जमीन व एनपीव्हीमुळे३प्रकल्प व्याप्तीमुळे वाढ ००.००१८०.५७१८०.५७२७.२७४संकल्पचित्रामुळे वाढ ००.००१११.०७१११.०७१६.७७५इतर कारणे ००.००००.००००.००००.००६ईटीपीमुळे वाढ२१.९०१४७.४७१२५.५७१८.९६एकूण१२०.३०७८२.५५६६२.२५६.२५ पटवर्षआर्थिक तरतूद प्रत्यक्ष खर्च (कोटींमध्ये)(कोटींमध्ये)१९९७-९८००.०९००.०९१९९८-९९००.०७००.०७१९९९-००००.०७००.०७२०००-०१००.२१००.२१२००१-०२१९.६२१९.६२२००२-०३१०.५६१०.५६२००३-०४२३.२५२३.२५२००४-०५००.०८००.०८२००५-०६११.२४११.२४२००६-०७००.१५ ००.१५२००७-०८००.०७००.०७२००८-०९४३.२६ ४३.२६२००९-१०९९.३८९९.३८२०१०-११२२.१८२२.१८२०११-१२४६.४६४६.४६२०१२-१३१६.९५१६.९५