शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा‘ आयटक’चा मेळाव्यात निषेध

By admin | Updated: May 29, 2017 16:48 IST

जूनमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चानिर्णय

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २९: देशातील कामगार कायद्यांची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी कामगारांच्यात एकजुटीने करुन सरकारशी मुकाबला करण्यासाठी लढा उभारण्यात येणार असून त्यासाठी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतमजूर व भूमीहिन शेतकऱ्यांना वयाच्या ५५ वर्षानंतर कायद्याची मंजूर झालेली पेन्शन योजना लागू करावी, सरकारचे कामगार विरोधी धोरण मोडीत काढून कामगार कायद्यांची अंमलबजावणी तीव्रतेने करावी, असंघटीत कामगारांना पेन्शन मिळाली पाहिजे आदी मागण्यासाठी सोमवारी दुपारी येथील मुस्लीम बोर्डीगच्या सभागृहात आयटक कामगार केंद्राच्यावतीने कामगार मेळावा झाला.

आयटकच सहसचीव दिलीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात कामगार नेत्यांनी सरकारच्या विवीध धोरणाचा समाचार घेतला. संघटनेचे अध्यक्ष एस.बी. पाटील, मेघा पानसरे आदी प्रमुख उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात दिलीप पवार म्हणाले, सद्याच्या अर्थनितीच्या भस्मासुरामुळे संपूर्ण समाजजीवन उध्दवस्त होत असल्याची टिका केली. ते म्हणाले, कामगार कायद्यांची पायमल्ली करुन हे सरकार कंपन्यामध्ये कंत्राटी कायदा आणून अनेक कामगारांना देशोधडीला लावत आहे. युवकांना नोकरीची प्रलोभने दाखवून सत्तेवर आलेल्या सरकारचे धोरण हे कामगार आणि शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा या सरकारविरोधात कामगार, शेतमजूर असंघटीत कामगारांनी एकसंघ राहून लढा उभारला पाहिजे. त्यासाठी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

मेघा पानसरे म्हणाल्या, देशातील भाजपाचे सरकार हे गरिबांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन श्रीमंतांची काळजी घेत आहे. नोकरदार महिला सुरक्षीत नाहीत. असंघटीत महिला कामगारांनी एकसंघ राहून लढा उभा केला पाहिजे. जात, धर्माच्या नावावर संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत, त्यामुळे एकसंघ राहून सर्वांनी लढ्यातून ताकद दाखवू.

रघुनाथ कांबळे म्हणाले, कामगारानां पेन्शन नाही, देशात दंगली घडवून राजकारण करण्याचे सरकारचे धोरण आहे, त्यामुळे या सरकारच्या धोरणाविरोधात रणशिंग फूंकूया. यावेळी अध्यक्ष एस. बी. पाटील, रघुनाथ देशींगे, विक्रम कदम, बाळासाहेब पोवार, आशा कुकडे, बाबा यादव आदींची भाषणे झाली.

प्रास्ताविक व सुत्रसंचालन महादेव पडवळे व बळवंत पोवार यांनी केले. यावेळी सुशिला यादव, रेखा कांबळे, उमेश पानसरे, जमीर शेख, दीपक निंबाळकर, वाय. के. कांबळे आदी उपस्थित होते. मेळाव्यात, घरेलू कामगार, शेतमजूर महिला लाल साड्या नेसून आपल्या लहान मुलांसहीत मोठ्या संख्येने उपस्थित राहील्या होत्या.