शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

क्षारपडमुक्त करून घेतले उसाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:24 IST

शिरोळ : जमीन क्षारपडमुक्त करून त्यातून भरघोस उत्पादन मिळविता येते, हे घालवाड (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने दाखवून दिले. शेतकरी ...

शिरोळ : जमीन क्षारपडमुक्त करून त्यातून भरघोस उत्पादन मिळविता येते, हे घालवाड (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने दाखवून दिले. शेतकरी राजाराम मारुती जाधव यांची गेली ४० वर्षे जमीन क्षारपड बनली होती. दत्त उद्योग समूहाच्यावतीने जमीन क्षारपडमुक्त करून तब्बल ४० वर्षांनंतर ३५ गुंठे क्षेत्रात ३७ टन उसाचे प्रथमच उत्पन्न घेतले.

दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, येणाऱ्या पिढीला शेतीविषयी जागरुकता व आवड निर्माण करण्याकरिता दत्त उद्योग समूह नेहमीच युवकांच्या सोबत असेल. क्षारपडमुक्त प्रकल्प हा निश्चितच शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारा आहे. त्यामुळे या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, शेतकरी जाधव यांनी आपली जमीन पिकाखाली आल्याबद्दल दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे आभार मानले. यावेळी दत्तचे संचालक प्रमोद पाटील, मानसिंग तिटवे, सतपाल खोंद्रे, जमील जमादार, बाबासाहेब भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

कोट - क्षारपडमुक्त प्रकल्पामुळे माझ्या शेतीचा कायापालट झाला आहे. गेल्या ४० वर्षांपासून क्षारपडमुळे जमीन नापीक बनली होती. दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या संकल्पनेतून क्षारपडमुक्त योजनेतून जमीन पिकाखाली आली आहे. त्यामुळे या उपक्रमाचा इतरही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

- राजाराम जाधव, शेतकरी, घालवाड

फोटो - २२०३२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - घालवाड (ता. शिरोळ) येथील शेतकरी राजाराम जाधव यांनी क्षारपडमुक्त प्रकल्प राबवून जमिनीतून उसाचे भरघोस उत्पन्न मिळविले. याबद्दल त्यांनी दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे आभार मानले, तर दुसऱ्या छायाचित्रात शेतकरी राजाराम जाधव आपल्या शेतातील ऊस दाखविताना.