शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

क्षारपडमुक्त करून घेतले उसाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:24 IST

शिरोळ : जमीन क्षारपडमुक्त करून त्यातून भरघोस उत्पादन मिळविता येते, हे घालवाड (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने दाखवून दिले. शेतकरी ...

शिरोळ : जमीन क्षारपडमुक्त करून त्यातून भरघोस उत्पादन मिळविता येते, हे घालवाड (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने दाखवून दिले. शेतकरी राजाराम मारुती जाधव यांची गेली ४० वर्षे जमीन क्षारपड बनली होती. दत्त उद्योग समूहाच्यावतीने जमीन क्षारपडमुक्त करून तब्बल ४० वर्षांनंतर ३५ गुंठे क्षेत्रात ३७ टन उसाचे प्रथमच उत्पन्न घेतले.

दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, येणाऱ्या पिढीला शेतीविषयी जागरुकता व आवड निर्माण करण्याकरिता दत्त उद्योग समूह नेहमीच युवकांच्या सोबत असेल. क्षारपडमुक्त प्रकल्प हा निश्चितच शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारा आहे. त्यामुळे या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, शेतकरी जाधव यांनी आपली जमीन पिकाखाली आल्याबद्दल दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे आभार मानले. यावेळी दत्तचे संचालक प्रमोद पाटील, मानसिंग तिटवे, सतपाल खोंद्रे, जमील जमादार, बाबासाहेब भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

कोट - क्षारपडमुक्त प्रकल्पामुळे माझ्या शेतीचा कायापालट झाला आहे. गेल्या ४० वर्षांपासून क्षारपडमुळे जमीन नापीक बनली होती. दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या संकल्पनेतून क्षारपडमुक्त योजनेतून जमीन पिकाखाली आली आहे. त्यामुळे या उपक्रमाचा इतरही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

- राजाराम जाधव, शेतकरी, घालवाड

फोटो - २२०३२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - घालवाड (ता. शिरोळ) येथील शेतकरी राजाराम जाधव यांनी क्षारपडमुक्त प्रकल्प राबवून जमिनीतून उसाचे भरघोस उत्पन्न मिळविले. याबद्दल त्यांनी दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे आभार मानले, तर दुसऱ्या छायाचित्रात शेतकरी राजाराम जाधव आपल्या शेतातील ऊस दाखविताना.