शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

गुळाचे दर पडल्याने उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 01:00 IST

हंगाम अंतिम टप्प्यात : रव्यांची आवक घटली

प्रकाश पाटील --- कोपार्डे  --यावर्षी ऊस उत्पादनात घट झाल्याचे चित्र निर्माण झाल्यानंतर गुळाला शेवटच्या टप्प्यात ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळू लागला; पण साखर कारखान्यांना जाणारा ऊस गुऱ्हाळघरांसाठी खरेदी करणाऱ्या गुऱ्हाळ मालकांना गुळाचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल कमी झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. आता गूळ उत्पादन कडू झाले असल्याच्या प्रतिक्रिया गुऱ्हाळघर मालकांकडून व्यक्त होत आहेत. मागील वर्षी मार्च ते मे पाणीटंचाई व जून ते आॅगस्ट अतिपाऊस यामुळे ऊस उत्पादन कमी झाले. आपले गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी साखर कारखान्यांनाही एफआरपीपेक्षा १७५ रुपये जादा दर द्यावा लागला. यामुळे उसउत्पादक शेतकऱ्यांनी गूळ उत्पादनाकडे पाठ फिरविली. जिल्ह्यातील १२०० गुऱ्हाळघरांपैकी केवळ ४०० ते ५०० गुऱ्हाळघरेच सुरू झाली. पण, हंगामाच्या सुरुवातीला सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विंटल मिळणारा दर डिसेंबर ते जानेवारी दरम्यान तीन हजार रुपयांच्या खाली आल्याने शेतकरी गुऱ्हाळघरांना ऊस देईनात. या दरम्यान गुऱ्हाळघर मालकांनी स्वत:च्या मालकीच्या उसाचे गाळप करण्यास सुरुवात केली. मात्र, जानेवारी अखेरपासून पुन्हा गुळाला चांगले दर येऊ लागल्याने ऊस उत्पादकांपेक्षा गुऱ्हाळघर मालकांनीच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तीन हजार ते ३५०० रुपये प्रतिटन दराने ऊस खरेदी केला. ऊस उत्पादकही आपल्या उसाचे मार्केटिंग करू लागले. साखर कारखान्यापेक्षा ४०० ते ५०० रुपये जादा दर मिळत असल्याने गुऱ्हाळघरांना वजनावर ऊस गाळपासाठी देऊ लागले. मात्र, आठ दिवसांपासून गुळाचे दर पुन्हा गडगडले असून, ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल मिळणारा दर ३५०० रुपये ते ४००० रुपयांवर आल्याने गुऱ्हाळघर मालक पुन्हा अडचणीत सापडला आहे. अडीच क्विंटल गूळ उत्पादनाच्या एकत्रित खर्चाची बेरीज मारली असता ९ हजार ८४० रुपये खर्च येत असून, उत्पन्न मात्र १० हजार रुपयांचे मिळत असल्याने गुऱ्हाळघर मालक हबकला आहे. ‘भिक नको, पण कुत्रे आवर’ असे म्हणण्याची वेळ गुऱ्हाळघर मालकांवर आली आहे. आता जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपल्याने विकत घेतलेला ऊस गुऱ्हाळात गाळप केल्याशिवाय आता गुऱ्हाळमालकांसमोर पर्याय उरलेला नाही. एका आदनाला अडीच क्विंटल गूळ तयार होतोसर्वसाधारण यासाठी येणार खर्च व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या लेखाजोखाऊस-सव्वादोन टन (३००० रूपये टन) - ७५०० रूपयेएकूण : ९८४० रुपये खर्चफेब्रुवारीमध्ये गुळाला मिळणारा दर पाहता तो पाच हजारांवरती पोहोचेल, असे चित्र होते. पण, ४०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दरात घसरण झाल्याने साखर कारखान्यांपेक्षा जादा दर देऊन खरेदी केलेल्या उसापासून गूळनिर्मिती तोट्यात चालली आहे. ३००० ते ३३०० रुपये दराने ऊस खरेदी केला असून, सध्याचा मिळणारा ४००० हजार रुपये दरही परवडत नाही.- राजू वडगावकर, गुऱ्हाळघर मालक शिंदेवाडी, ता. करवीर.जर अडीच क्विंटल गुळाला सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तरी १० हजार रुपये मिळतात. आणि खर्च ९ हजार ८४० रुपये होतो. शेतकऱ्याच्या हातात उरतात केवळ १६० रुपये. यावरून गूळ उत्पादन किती तोट्याचे आहे, हे स्पष्ट होते.