शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST

जयसिंगपूर : महापुराचा फटका शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसतो. याबाबत नागरिकांचे सहा आठवड्यांत पुनर्वसन करावे, असा आदेश ...

जयसिंगपूर : महापुराचा फटका शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसतो. याबाबत नागरिकांचे सहा आठवड्यांत पुनर्वसन करावे, असा आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्याचा आदर करत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पूरग्रस्तांना एकत्रित करून मोठी चळवळ उभारणार असल्याची माहिती शिरोळ तालुका पुनर्वसन संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी गायकवाड म्हणाले, २०१९ च्या महापुराचा शिरोळ, हातकणंगले, कागल, पन्हाळा, करवीर, चंदगड या तालुक्यांना फटका बसला होता. यामध्ये हजारो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षीही महापूर येण्याची शक्यता आहे. अशावेळी शासनाकडून तुटपुंजी मदत होते व कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे पुनर्वसन संघटनेकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने प्रशासनाला सहा आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु अजूनही त्या विषयावर कोणतीही हालचाल नाही. तातडीने जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा. त्यासाठी आम्ही मंत्री व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे. या वेळी धनंजय माळी, वैभव गोरे, यल्लाप्पा कांबळे, गोपीचंद गवळी, शुभम चव्हाण, प्रकाश तगारे, रामदास भंडारे, सतीश चव्हाण, सुरेश तगारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.