शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

तुमच्या वादापेक्षा समस्या महत्त्वाच्या!

By admin | Updated: March 4, 2015 00:45 IST

जनता दरबारास गर्दी : नगरसेवकांच्या आवाहनास प्रतिसाद नाही

कोल्हापूर : ‘जनता दरबार’ला उपस्थित राहू नये, असे आवाहन उपमहापौर मोहन गोंजारे यांनी केले असतानाही मंगळवारी महापौरांच्या ‘जनता दरबार’ला चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्या तक्रारी मांडण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी करत तुमच्या वादापेक्षा आमच्या समस्या अधिक महत्त्वाच्या असल्याचे दाखवून दिले. महानगरपालिकेसमोर मंगळवारी नगरसेवकांनी महापौर माळवी यांच्या राजीनाम्यासाठी लाक्षणिक उपोषण आयोजित केले होते. तसेच उपमहापौर गोंजारे यांनी लाच प्रकरणात सापडलेल्या महापौर तृप्ती माळवी यांनी नैतिक अधिकार गमावला असल्याने त्यांनी आयोजित केलेल्या ‘जनता दरबारा’त कोणीही जाऊ नये, असे आवाहन केले होते. तरीही पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे महापौर माळवी यांनी महापालिकेत येऊन ‘जनता दरबार’ घेतला. विशेष म्हणजे उपमहापौरांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. जनता दरबारात शंकर कामिरे, रंगराव खामकर, संजय शिंदे, संभाजी ससे, इंदुबाई रेडेकर, रूपा मंडलिक, वर्धमान ओसवाल, दिनेश जाधव, उत्तम सरनाईक यांच्यासह आदींनी वैयक्तिक तसेच सार्वजनिक तक्रारी मांडल्या. घरगुती पाणी वापराचे बिल अधिक येत असल्याच्या तक्रारीही यावेळी करण्यात आल्या. सार्वजनिक शौचालयांवरील पत्रे दुरुस्ती, मनपाच्या शाळांचे खराब झालेले दरवाजे, राजारामपुरीतील सार्वजनिक विहिरीवरील अस्वच्छता, आदींबाबत तक्रारी करण्यात आल्या.राजारामपुरीतील मैदानाबाबत इशाराराजारामपुरीतील शाळा क्रमांक ९ च्या मैदानाबाबतही कमलाकर जगदाळे यांनी तक्रार केली. सध्या शाळा क्रमांक ९ बंद केल्यामुळे हे मैदान भाड्याने दिले जाते. त्यामुळे राजारामपुरीतील मुलांना खेळायला मैदान मिळत नाही. आता तर ते आरटीओला भाड्याने द्यायचे ठरविले जात आहे तसे झाले तर त्याविरोधात राजारामपुरीतील सर्व नागरिक महापालिकेच्या विरोधात आंदोलन करतील, असा इशारा कमलाकर जगदाळे यांनी दिला. त्यावेळी महापौरांनी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. जनता दरबारासाठी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे, साहायक आयुक्त उमेश रणदिवे, जलअभियंता मनीष पोवार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नगरसेवकांचे अशोभनीय कृत्यकोल्हापूर : महानगरपालिकेतून बाहेर पडताना मंगळवारी सूडबुद्धीने माझ्यावर हल्ला करण्याच्या हेतूने काही नगरसेवकांनी केलेले कृत्य हे अशोभनीय असून, मी त्याची निंदा करते, अशा शब्दांत महापौर तृप्ती माळवी यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आहे. याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात महापौर माळवी यांनी म्हटले आहे की, आजवर ‘जनता दरबार’च्या माध्यमातून लोकहितांची कामे करण्याचा मान महापौर म्हणून मला मिळाला. महापौर म्हणून काम करत असताना राजकीय हेतूने मला लाच प्रकरणात गोवण्यात आले. हे राजकीय षङ्यंत्र असल्याचे मी वारंवार सांगितले आहे. मंगळवारी मी ठरल्याप्रमाणे जनता दरबार संपल्यानंतर महापालिकेतून बाहेर पडत असताना सूडबुद्धीने माझ्यावर हल्ला करण्याच्या हेतूने काही नगरसेवकांनी खालच्या पातळीवर जाऊन अशोभनीय कृत्य केले. मी एक विधवा महिला आहे म्हणून राजकीय द्वेषापोटी दबावतंत्राचा वापर करत आहेत. अशाप्रकारचा कोणताही दबाव माझ्या लोकहिताच्या कामांना अडथळा ठरू शकत नाही. या हल्ल्याला न घाबरता मी माझे लोकहिताचे व सामाजिक काम अधिक जोमाने करणार आहे. नगरसेवकांनी वैयक्तिक टीका व निंदनीय हल्ले करण्यापेक्षा लोकहिताची कामे करुया, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)