शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात दुर्गंधीयुक्त गटारींचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST

करंजफेण : स्वच्छ भारत अभियान योजने अंतर्गत ग्रामीण भागातील खेडी स्वच्छ, समृद्ध होऊन लोकांचे आरोग्य निरोगी राहावे या हेतूने ...

करंजफेण : स्वच्छ भारत अभियान योजने अंतर्गत ग्रामीण भागातील खेडी स्वच्छ, समृद्ध होऊन लोकांचे आरोग्य निरोगी राहावे या हेतूने गाव विकासासाठी शासन लाखोंचा निधी खर्च करूनदेखील गावोगावी गटारींचा प्रश्न जैसे थे अवस्थेत राहू लागल्याचे विदारक चित्र निर्माण होऊ लागल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. प्रतिवर्षी शासनाचा ग्रामपंचायतींना येणारा वित्त आयोगाचा निधी, जिल्हा परिषद, पंचायत समितीकडून येणारा निधी यातील बहुतांश निधीची रक्कम ही गटारी बांधकामावर खर्च केली जात असल्याचे वास्तव आहे. गावोगावी गल्लीबोळांतील गटारी बांधकाम करण्यावर वर्षानुवर्ष शासनाचा लाखोचा निधी खर्च होत असतो. गटारीमध्ये पावसाळ्यात साचलेला गाळ अगर नियमितचा पडणारा कचरा साचण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छतेअभावी लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या गटारी जमीनीत गाडल्या गेल्या असून, त्यावरून गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याचे अनेक ठिकाणी वास्तव चित्र आहे, तर गल्ली-बोळांतील गटारींमध्ये स्वच्छतेच्या अभावामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने गटारींत खातीरा साचून गावोगावी दुर्गंधी पसरण्याबरोबर डासांच्या उत्पत्तीत वाढ होऊन मलेरियासारख्या जीवघेण्या आजाराचे लोक बळी ठरत आहेत. त्यामुळे खेडी स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी ग्रामपंचायतीने गटारी बांधकामावर खर्च करण्याबरोबर स्वच्छ व वाहती गटारी राखण्यासाठी गटारी स्वच्छतेवर निधी खर्च करून गाव स्वच्छ, समृद्ध ठेवण्याची गरज आहे.

उंड्री,(ता. पन्हाळा)

फोटो : ग्रामीण भागामध्ये गटारींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.