शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

ग्रामीण भागात दुर्गंधीयुक्त गटारींचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST

करंजफेण : स्वच्छ भारत अभियान योजने अंतर्गत ग्रामीण भागातील खेडी स्वच्छ, समृद्ध होऊन लोकांचे आरोग्य निरोगी राहावे या हेतूने ...

करंजफेण : स्वच्छ भारत अभियान योजने अंतर्गत ग्रामीण भागातील खेडी स्वच्छ, समृद्ध होऊन लोकांचे आरोग्य निरोगी राहावे या हेतूने गाव विकासासाठी शासन लाखोंचा निधी खर्च करूनदेखील गावोगावी गटारींचा प्रश्न जैसे थे अवस्थेत राहू लागल्याचे विदारक चित्र निर्माण होऊ लागल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. प्रतिवर्षी शासनाचा ग्रामपंचायतींना येणारा वित्त आयोगाचा निधी, जिल्हा परिषद, पंचायत समितीकडून येणारा निधी यातील बहुतांश निधीची रक्कम ही गटारी बांधकामावर खर्च केली जात असल्याचे वास्तव आहे. गावोगावी गल्लीबोळांतील गटारी बांधकाम करण्यावर वर्षानुवर्ष शासनाचा लाखोचा निधी खर्च होत असतो. गटारीमध्ये पावसाळ्यात साचलेला गाळ अगर नियमितचा पडणारा कचरा साचण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छतेअभावी लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या गटारी जमीनीत गाडल्या गेल्या असून, त्यावरून गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याचे अनेक ठिकाणी वास्तव चित्र आहे, तर गल्ली-बोळांतील गटारींमध्ये स्वच्छतेच्या अभावामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने गटारींत खातीरा साचून गावोगावी दुर्गंधी पसरण्याबरोबर डासांच्या उत्पत्तीत वाढ होऊन मलेरियासारख्या जीवघेण्या आजाराचे लोक बळी ठरत आहेत. त्यामुळे खेडी स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी ग्रामपंचायतीने गटारी बांधकामावर खर्च करण्याबरोबर स्वच्छ व वाहती गटारी राखण्यासाठी गटारी स्वच्छतेवर निधी खर्च करून गाव स्वच्छ, समृद्ध ठेवण्याची गरज आहे.

उंड्री,(ता. पन्हाळा)

फोटो : ग्रामीण भागामध्ये गटारींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.