शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

आजपासून खासगी आराम बस वाहतूक पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ब्रेक द चेनच्या निर्देशाचे पालन करून आज, सोमवारपासून कोल्हापुरातून बाहेर जाणारी खासगी आराम ...

कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ब्रेक द चेनच्या निर्देशाचे पालन करून आज, सोमवारपासून कोल्हापुरातून बाहेर जाणारी खासगी आराम बससेवा पूर्ववत होणार आहे. प्रवाशांना ॲंटिजन अथवा आरटीपीसीआर चाचणी आवश्यक करण्यात आली आहे.

राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध व्यवसायांवर निर्बंध आणले आहेत. त्यात एस.टी.ची बससेवाही बंद केली आहे. मात्र, प्रवाशांची सोय व्हावी याकरिता खासगी आराम बसेसना अटी-शर्तींवर परवानगी दिली आहे. त्यानुसार ५० टक्के आसन क्षमता, संपूर्ण बस सॅनिटाईझ करून घेणे, प्रत्येक प्रवाशाची ॲंटिजन चाचणी, थर्मल चाचणी आवश्यक केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जेथे प्रवासी उतरणार आहेत, तेथे एकच थांबा करावा. येणाऱ्या प्रवाशांची ॲंटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी करून बस पुढे जाऊ द्यावी. कोल्हापूर, इचलकरंजी शहर, शाहूवाडी, गडहिंग्लज येथील बस वाहतूक संघटनेचा प्रतिनिधी उपस्थित राहणे गरजेचे आहे. सर्व नियमांची अंमलबजावणी होती की नाही याची जबाबदारी या प्रतिनिधीवर राहणार आहे. कोल्हापुरातून मुंबई, पुणे, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, लातूर, नांदेड, नागपूर, बेंगलोर, हैदराबाद आदी मार्गावर बसेस ये-जा करणार आहेत. याकरिता सर्व चाचण्या करून त्याचे अहवाल प्रवाशांनी आधीच तयार करून घ्यावेत. त्यामुळे वेळेची बचत होईल. खासगी आराम बसेसना ई-पास आवश्यक नाही. तरीसुद्धा त्याची मागणी प्रशासनाकडून केली जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे दाद मागण्यात आली आहे. तरी या सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन खासगी बस वाहतूक संघटनेतर्फे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी केले आहे.