शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

संस्थात्मक अलगीकरणाला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:23 IST

कोल्हापूर : ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामसमित्या सक्रिय करा, पॉझिटिव्ह् आलेल्या रुग्णाला गृहअलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरण करा, ६० ...

कोल्हापूर : ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामसमित्या सक्रिय करा, पॉझिटिव्ह् आलेल्या रुग्णाला गृहअलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरण करा, ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केल्या.

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही दोन पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेलीच आहे. शिवाय मृत्यूदरदेखील जास्त आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंबंधी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सकाळी दूरदृष्यप्रणालीद्वारे ग्रामसमित्या, सरपंच, अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. फारुख देसाई उपस्थित होते.

ते म्हणाले, आपले गाव कोरोनामुक्त व्हावे, यासाठी प्रत्येक गावकऱ्याने योगदान द्यावे. मागीलवर्षीप्रमाणे आतादेखील ग्रामसमित्यांनी सक्रियपणे काम करावे. पॉझिटिव्ह रुग्ण गृहविलगीकरणात राहिल्याने त्यांच्यामुळे कुटुंबियांना संसर्ग होत आहे. त्यामुळे रुग्णांना गृहविलगीकरणात न ठेवता त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करा, याठिकाणी औषधे व सोयी-सुविधा पुरवा, त्यासाठी ग्राम दक्षता समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद करा किंवा गावातील दानशूर व्यक्तींची मदत घ्या, तपासण्यांचे प्रमाण वाढवा, ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या, त्यांचे स्वतंत्र नियोजन करा, लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्या. डॉ. योगेश साळे ायांनी कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेतला.

--