शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंद यांची तत्त्वे सर्वसमावेशक

By admin | Updated: December 1, 2015 00:36 IST

प्रकाश पाठक : तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला

कोल्हापूर : मानवाला जी अभिप्रेत असलेली विवेकांनद यांची तत्त्वे सर्वसमावेशक आहेत ती आचरणात आणावी, असे प्रतिपादन धुळे येथील प्रकाश पाठक (सी.ए.) यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. येथील तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ‘विवेकानंद-सहिष्णू हिंदू धर्म’ या विषयावर ते बोलत होते. श्री महालक्ष्मी को-आॅप. बँक व ब्राह्मण सभा, करवीर मंगलधाम यांच्यावतीने ही व्याख्यानमाला प्रायव्हेट हायस्कूलच्या खुल्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.प्रकाश पाठक म्हणाले, विवेकानंद यांची ही तत्त्वे स्वातंत्र, समता व बंधूता या त्रिसूत्रींवर आधारित आहेत. पाश्चिमात्य देशातील पिल गेटस यांनीही विवेकांनद यांच्या या त्रिसूत्रीचे अनुकरण केले. तत्त्वे ही अर्थगामी नसावीत, ती मुलगामी असावीत. छोटा-मोठा, कनिष्ठ-वरिष्ठ असे हिंदू धर्मात कोणी नाही. विवेकानंद यांनी सहा वर्षे भारतभ्रमण करताना भगवद्गीता, पुराण, उपनिषिदे, वेद यांचा व व्याकरण, विविध भाषा यांचा सखोल अभ्यास केला. त्यांचा त्यांना जीवनात उपयोग झाला. स्वातंत्र्य, समता हे दोन्ही समतोल ठेवण्यासाठी बंधूता हे महत्त्वाचे आहे. माणसाचा जन्म हा कर्म व कर्मयोगावर आधारित असतो. जो लवचिक असतो, तो सहिष्णू नसतो. जो सहिष्णू असतो, तो लवचिक नसतो. एखाद्याने आपल्यावर प्रहार केला, तर त्याची तक्रार करीत बसू नका, समाजाला दिशा देण्याचे काम करा.ते म्हणाले, हिंदू धर्मातील प्रेम आणि वेडा यातील फरक सांगताना कोणीही धर्म वेडे नसतात, ते धर्मप्रेमी असतात. जे असेल ते मांडा, जो चुकेल ते शब्दात मांडा. प्रत्येक व्यक्तीने आध्यात्मिक होण्याची गरज आहे, धार्मिक होता कामा नये. जे करायचे आहे, ते बोलायचे नाही. चांगले करण्यासाठी त्रास सोसावा लागतो. यावेळी बँकेचे संचालक, ब्राह्मण सभा, करवीर मंगलधामचे पदाधिकारी उपस्थित होते.