शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विवेकानंद यांची तत्त्वे सर्वसमावेशक

By admin | Updated: December 1, 2015 00:36 IST

प्रकाश पाठक : तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला

कोल्हापूर : मानवाला जी अभिप्रेत असलेली विवेकांनद यांची तत्त्वे सर्वसमावेशक आहेत ती आचरणात आणावी, असे प्रतिपादन धुळे येथील प्रकाश पाठक (सी.ए.) यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. येथील तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ‘विवेकानंद-सहिष्णू हिंदू धर्म’ या विषयावर ते बोलत होते. श्री महालक्ष्मी को-आॅप. बँक व ब्राह्मण सभा, करवीर मंगलधाम यांच्यावतीने ही व्याख्यानमाला प्रायव्हेट हायस्कूलच्या खुल्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.प्रकाश पाठक म्हणाले, विवेकानंद यांची ही तत्त्वे स्वातंत्र, समता व बंधूता या त्रिसूत्रींवर आधारित आहेत. पाश्चिमात्य देशातील पिल गेटस यांनीही विवेकांनद यांच्या या त्रिसूत्रीचे अनुकरण केले. तत्त्वे ही अर्थगामी नसावीत, ती मुलगामी असावीत. छोटा-मोठा, कनिष्ठ-वरिष्ठ असे हिंदू धर्मात कोणी नाही. विवेकानंद यांनी सहा वर्षे भारतभ्रमण करताना भगवद्गीता, पुराण, उपनिषिदे, वेद यांचा व व्याकरण, विविध भाषा यांचा सखोल अभ्यास केला. त्यांचा त्यांना जीवनात उपयोग झाला. स्वातंत्र्य, समता हे दोन्ही समतोल ठेवण्यासाठी बंधूता हे महत्त्वाचे आहे. माणसाचा जन्म हा कर्म व कर्मयोगावर आधारित असतो. जो लवचिक असतो, तो सहिष्णू नसतो. जो सहिष्णू असतो, तो लवचिक नसतो. एखाद्याने आपल्यावर प्रहार केला, तर त्याची तक्रार करीत बसू नका, समाजाला दिशा देण्याचे काम करा.ते म्हणाले, हिंदू धर्मातील प्रेम आणि वेडा यातील फरक सांगताना कोणीही धर्म वेडे नसतात, ते धर्मप्रेमी असतात. जे असेल ते मांडा, जो चुकेल ते शब्दात मांडा. प्रत्येक व्यक्तीने आध्यात्मिक होण्याची गरज आहे, धार्मिक होता कामा नये. जे करायचे आहे, ते बोलायचे नाही. चांगले करण्यासाठी त्रास सोसावा लागतो. यावेळी बँकेचे संचालक, ब्राह्मण सभा, करवीर मंगलधामचे पदाधिकारी उपस्थित होते.