शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विवेकानंद यांची तत्त्वे सर्वसमावेशक

By admin | Updated: December 1, 2015 00:36 IST

प्रकाश पाठक : तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला

कोल्हापूर : मानवाला जी अभिप्रेत असलेली विवेकांनद यांची तत्त्वे सर्वसमावेशक आहेत ती आचरणात आणावी, असे प्रतिपादन धुळे येथील प्रकाश पाठक (सी.ए.) यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. येथील तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ‘विवेकानंद-सहिष्णू हिंदू धर्म’ या विषयावर ते बोलत होते. श्री महालक्ष्मी को-आॅप. बँक व ब्राह्मण सभा, करवीर मंगलधाम यांच्यावतीने ही व्याख्यानमाला प्रायव्हेट हायस्कूलच्या खुल्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.प्रकाश पाठक म्हणाले, विवेकानंद यांची ही तत्त्वे स्वातंत्र, समता व बंधूता या त्रिसूत्रींवर आधारित आहेत. पाश्चिमात्य देशातील पिल गेटस यांनीही विवेकांनद यांच्या या त्रिसूत्रीचे अनुकरण केले. तत्त्वे ही अर्थगामी नसावीत, ती मुलगामी असावीत. छोटा-मोठा, कनिष्ठ-वरिष्ठ असे हिंदू धर्मात कोणी नाही. विवेकानंद यांनी सहा वर्षे भारतभ्रमण करताना भगवद्गीता, पुराण, उपनिषिदे, वेद यांचा व व्याकरण, विविध भाषा यांचा सखोल अभ्यास केला. त्यांचा त्यांना जीवनात उपयोग झाला. स्वातंत्र्य, समता हे दोन्ही समतोल ठेवण्यासाठी बंधूता हे महत्त्वाचे आहे. माणसाचा जन्म हा कर्म व कर्मयोगावर आधारित असतो. जो लवचिक असतो, तो सहिष्णू नसतो. जो सहिष्णू असतो, तो लवचिक नसतो. एखाद्याने आपल्यावर प्रहार केला, तर त्याची तक्रार करीत बसू नका, समाजाला दिशा देण्याचे काम करा.ते म्हणाले, हिंदू धर्मातील प्रेम आणि वेडा यातील फरक सांगताना कोणीही धर्म वेडे नसतात, ते धर्मप्रेमी असतात. जे असेल ते मांडा, जो चुकेल ते शब्दात मांडा. प्रत्येक व्यक्तीने आध्यात्मिक होण्याची गरज आहे, धार्मिक होता कामा नये. जे करायचे आहे, ते बोलायचे नाही. चांगले करण्यासाठी त्रास सोसावा लागतो. यावेळी बँकेचे संचालक, ब्राह्मण सभा, करवीर मंगलधामचे पदाधिकारी उपस्थित होते.