शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

सोयाबीनचा दर १० हजार, शेतकऱ्यांच्या हातात ६ ते ८ हजारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:28 IST

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली मागणी, खाद्यतेलाचे वाढलेले दर आणि अतिवृष्टी, महापुराचा फटका बसल्याने कमी झालेले उत्पादन यामुळे सोयाबीनच्या ...

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली मागणी, खाद्यतेलाचे वाढलेले दर आणि अतिवृष्टी, महापुराचा फटका बसल्याने कमी झालेले उत्पादन यामुळे सोयाबीनच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. कधी नव्हे इतक्या १० हजार रुपये क्विंटल अशा सोयाबीन दराने ऐतिहासिक टप्पा गाठला आहेे. शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडण्याची चिन्हे असतानाच व्यापाऱ्यांकडून आर्द्रता, काडीकचरा, गुणवत्ता, असे निकष लावून शेतकऱ्यांच्या हातात क्विंटलला सहा ते आठ हजार रुपयेच टेकवले जात आहेत.

गेल्यावर्षी खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर चढू लागले आहेत. अडीच हजारांवर असणारा दर एकदम दीड हजाराने वाढून तो ३९०० ते ४३०० इतका झाला. हंगाम पुढे सरकेल, तसे दर वाढतच गेले. उन्हाळी हंगामात ७ ते ८ हजार रुपये उच्चांकी भाव मिळाला. साहजिकच खरिपात सोयाबीनच्या पेरणीकडे कल वाढला. पीकक्षेत्र वाढल्याने दरात कमी येईल, असा कयास बांधला जात होता. तथापि, जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. नदीकाठचे तर सोयाबीन कुजून गेले. माळरानावरचे सोयाबीन तरले; पण पाऊस ओसरल्यानंतर तांबेरा, करपा, पाने खाणाऱ्या अळीसह तुडतुडे, माव्यांनी मोठ्या प्रमाणावर आक्रमण केल्याने सोयाबीन पिकावर औषध फवारण्या वाढवाव्या लागल्या. लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून गेल्या दीड - दोन वर्षांत कीटकनाशकांच्या किमती दुपटी-तिपटीने वाढल्या आहेत. एका गुंठ्याचा फवारणीचा खर्च १५० ते २०० रुपये झाला. शिवाय आंतरमशागतीसह कापणी, मळणीचा खर्चही गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढला आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनला चांगला भाव मिळेल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी हा खर्चही पेलला; पण प्रत्यक्षात विक्री सुरू झाल्यावर व्यापाऱ्यांकडून लूट सुरू झाली आहे. हवा जास्त आहे, काडीकचरा आहे, असे सांगत दरात कपात केली जात आहे, तसेच काटामारीही वाढली आहे. दर दहा हजार असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सहा ते आठ हजारच हातावर टेकवले जात आहेत. उघडपणे सुरू असलेल्या या लुटीची तक्रार करायची तरी कोणाकडे? या संभ्रमावस्थेत उत्पादक आहेत.

सोयाबीनचे वाढत गेलेले दर (क्विंटलमध्ये)

वर्ष दर

सप्टेंबर २०१८ १९००

सप्टेंबर २०१९ २५००

सप्टेंबर २०२० ३९००

एप्रिल २०२१ ७०००

सप्टेंबर २०२१ १००००

चौकट

अशी होते लूट (एका पोत्यामागे)

बारदान: २ किलो

काडीकचरा: ३ किलो

हवा : २ ते ३ किलो

चौकट

जिल्ह्यातील सोयाबीनचे क्षेत्र : ४० हजार ४७८ हेक्टर

सरासरी उत्पादकता : एकरी सरासरी १५ ते २० क्विंटल

मिळणारा दर : ६ ते ८ हजार

एकरी उत्पादन खर्च : २५ ते ३० हजार

चाैकट

मार्केटिंग फेडरेशन सूचनेच्या प्रतीक्षेत

किमान आधारभूत किमतीच्या वर सोयाबीनचे दर गेल्याने यावर्षी मार्केटिंग फेडरेशनचे काही काम उरलेले नाही. तसे दरवर्षीही त्यांना नसतेच. किमान हमीभावापेक्षाही कमी दराने गेल्यावर्षीच्या खरिपात सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांकडून होत होती, तरीदेखील फेडरेशनने केंद्र सुरू करायची तसदी घेतली नाही, की कारवाई केली नाही. यावर्षी तर दर वाढल्याने फेडरेशनचा विषयच संपला आहे. तरीदेखील कार्यालयाकडे विचारणा केल्यावर, सरकारच्या सूचना आल्यावर पाहू, असे उत्तर देण्यात आले.

चौकट

वर्षातून दोन वेळा उत्पादन

साेयाबीनचे उत्पादन खरीप, रब्बी, उन्हाळी अशा तीनही हंगामात येईल, असे वाण विकसित केले आहेत. जीएस ३३५ व ९३०५ हे वाण ९० ते १२० दिवसात येत असल्याने आणि टपोऱ्या दाण्यासह उताराही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून मागणी कायम आहे. चांगला दर मिळत असल्याने वर्षातून दोनवेळा लागवड करण्याकडे कल वाढला आहे.