शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

देवस्थानमधील धर्मविरोधी कृती रोखा

By admin | Updated: January 11, 2016 01:08 IST

राष्ट्रीय हिंदू आंदोलनची मागणी : काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी निदर्शने

कोल्हापूर : शनिशिंगणापूरसह इतर देवस्थानांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ‘पनूून काश्मीर’ द्यावे या मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनतर्फे रविवारी छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली.दुपारी बाराच्या सुमारास सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकवटले. घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन आज, सोमवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे.काश्मीर खोऱ्यातील स्वतंत्र भारतात पाकिस्तानपुरस्कृत जिहादी दहशतवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य करून आक्रमणे करून अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली. इतरांवर अत्याचार करून त्यांना धमकावण्यात आल्याने साडेचार लाखांहून अधिक हिंदूंना काश्मीर खोऱ्यातून सन १९९० ला विस्थापित व्हावे लागले. या घटनेला दि. १९ जानेवारी २०१६ या दिवशी २६ वर्षे पूर्ण होत आहेत. सन १९९०पासून या विस्थापित हिंदंूचे अद्याप पुनर्वसन झालेले नसून ते न्यायापासून वंचित आहेत. तरी काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना ‘वंशसंहार’ म्हणून ओळखले जावे. त्या अत्याचारांची न्यायिक लवादाद्वारे ठरावीक कालमर्यादेत चौकशी करावी. या हिंदूंच्या सुरक्षित परतीसाठी स्वतंत्रपणे ‘पनून काश्मीर’ नावाच्या केंद्रशासित क्षेत्रास मान्यता द्यावी.त्याचबरोबर शनिशिंगणापूर येथील मंदिर व्यवस्थापनाने काही वर्षांपूर्वीच चौथऱ्यावर चढून शनिदेवाला तेलार्पण करण्यास बंदी घातली होती. सध्या सर्वच जाती-धर्माचे स्त्री-पुरुष भक्त शनिदेवाचे दूरवरून दर्शन घेतात. त्यामुळे तेथे केवळ स्त्रियांनाच बंदी आहे, असे म्हणणे अयोग्य आहे. हा विषय स्त्री मुक्तीचा नसून पूर्णत: आध्यात्मिक आहे तरी तथाकथित पुरोगामी संघटना धर्मातील परंपरा, रूढी आणि श्रद्धा यावर जाणीवपूर्वक आघात करत आहेत. धर्माच्या दृष्टीने हे वर्तन अयोग्य आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक धर्मविरोधी कृती करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (एनसीईआरटी) अभ्यासक्रमात इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात भारतीय संस्कृतीविषयी खोटी व अवमानकारक माहिती देणारे लिखाण केले आहे. त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. आंदोलनात मधुकर नाझरे, शिवाजीराव ससे, संभाजीराव भोकरे, शिवानंद स्वामी, राजू यादव, डॉ. मानसिंग शिंदे, संजय कुलकर्णी, अंजली कोटगी, सुरेखा काकडे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)