शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

फुले, शाहू, आंबेडकरांच्या मार्गानेच राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST

कोल्हापूर : देशाची एकता, अखंडता, बंधुता जोपासायची तर फुले, शाहू, आंबेडकर यांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच चालावे लागेल, असे प्रतिपादन ...

कोल्हापूर : देशाची एकता, अखंडता, बंधुता जोपासायची तर फुले, शाहू, आंबेडकर यांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच चालावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. स्वातंत्र्यप्राप्तीला पाऊणशे वर्षे झाली तरी अद्यापही आपल्यातला भेदभाव, अज्ञान, परस्परांमधला कटुताभाव दूर होऊ शकलेला नाही. परस्परद्वेषाच्या पायावर कोणतेही राष्ट्र उभारू शकत नाही. आपल्यातले भेद जितक्या लवकर दूर होतील, तितके एक राष्ट्र म्हणून आपण मजबूत होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शाहू जयंतीचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ‘राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर आयोजित विशेष ऑनलाइन व्याख्यानामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. प्रकुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये जे राजकीय, सामाजिक योगदान दिले, त्या कार्याची व्याप्ती पाहता, ते खऱ्या अर्थाने राष्ट्रबांधणीचे, राष्ट्रउभारणीचे कार्य होते. ते पुढे नेण्याचे त्याला घटनेच्या साच्यात आकार देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आज त्या कार्याला आव्हान देण्याचे घातक प्रयत्न होत आहेत. आपले राष्ट्र हे कोण्या एका धर्माचे नसून सर्व धर्मीयांचे आहे, अशी समभावाची भावना जोपासली जाणे, वृद्धिंगत होणे ही फार महत्त्वाची बाब आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार हा राजर्षी शाहूंच्या कार्याचा पाया होता. प्रत्येक घटकासाठी त्यांनी दूरगामी ठरणारे निर्णय घेतले. शिक्षण, कला, संगीत, शेती, सहकार, जलसिंचन, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान राष्ट्रनिर्मितीचेच कार्य आहे. प्रकुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

सामूहिक शहाणपणा वाढावा

राष्ट्र टिकवायचे असेल, तर आपण सर्व धर्मांचे आहोत, ही भावना दृढमूल होणे आवश्यक आहे. भावना भडकावणाऱ्या प्रवृत्तींपासून दूर राहावयाचे असेल, तर स्वतः शहाणे होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण हाच एकमेव उपाय आहे. महात्मा फुले यांच्यापासून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत बहुजन समाजाच्या हरेक नेतृत्वाने समाजाचा सामूहिक शहाणपणा कसा वाढेल, याकडे लक्ष केंद्रित केलेले होते. या सामूहिक शहाणपणाच्या व्याप्तीवरच देशाचे शहाणपण, देशाचा सर्वधर्मसमभाव या गोष्टी अवलंबून असतात, असेही डॉ. पवार म्हणाले.

फोटो २६०६२०२१-कोल-शिवाजी युनिव्हर्सिटी

फोटो ओळ: मुख्य प्रशासकीय इमारत व राजर्षी शाहू संशोधन केंद्रामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रकुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत व शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक डॉ. जयसिंगराव पवार, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते.