शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

फुले, शाहू, आंबेडकरांच्या मार्गानेच राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST

कोल्हापूर : देशाची एकता, अखंडता, बंधुता जोपासायची तर फुले, शाहू, आंबेडकर यांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच चालावे लागेल, असे प्रतिपादन ...

कोल्हापूर : देशाची एकता, अखंडता, बंधुता जोपासायची तर फुले, शाहू, आंबेडकर यांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच चालावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. स्वातंत्र्यप्राप्तीला पाऊणशे वर्षे झाली तरी अद्यापही आपल्यातला भेदभाव, अज्ञान, परस्परांमधला कटुताभाव दूर होऊ शकलेला नाही. परस्परद्वेषाच्या पायावर कोणतेही राष्ट्र उभारू शकत नाही. आपल्यातले भेद जितक्या लवकर दूर होतील, तितके एक राष्ट्र म्हणून आपण मजबूत होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शाहू जयंतीचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ‘राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर आयोजित विशेष ऑनलाइन व्याख्यानामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. प्रकुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये जे राजकीय, सामाजिक योगदान दिले, त्या कार्याची व्याप्ती पाहता, ते खऱ्या अर्थाने राष्ट्रबांधणीचे, राष्ट्रउभारणीचे कार्य होते. ते पुढे नेण्याचे त्याला घटनेच्या साच्यात आकार देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आज त्या कार्याला आव्हान देण्याचे घातक प्रयत्न होत आहेत. आपले राष्ट्र हे कोण्या एका धर्माचे नसून सर्व धर्मीयांचे आहे, अशी समभावाची भावना जोपासली जाणे, वृद्धिंगत होणे ही फार महत्त्वाची बाब आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार हा राजर्षी शाहूंच्या कार्याचा पाया होता. प्रत्येक घटकासाठी त्यांनी दूरगामी ठरणारे निर्णय घेतले. शिक्षण, कला, संगीत, शेती, सहकार, जलसिंचन, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान राष्ट्रनिर्मितीचेच कार्य आहे. प्रकुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

सामूहिक शहाणपणा वाढावा

राष्ट्र टिकवायचे असेल, तर आपण सर्व धर्मांचे आहोत, ही भावना दृढमूल होणे आवश्यक आहे. भावना भडकावणाऱ्या प्रवृत्तींपासून दूर राहावयाचे असेल, तर स्वतः शहाणे होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण हाच एकमेव उपाय आहे. महात्मा फुले यांच्यापासून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत बहुजन समाजाच्या हरेक नेतृत्वाने समाजाचा सामूहिक शहाणपणा कसा वाढेल, याकडे लक्ष केंद्रित केलेले होते. या सामूहिक शहाणपणाच्या व्याप्तीवरच देशाचे शहाणपण, देशाचा सर्वधर्मसमभाव या गोष्टी अवलंबून असतात, असेही डॉ. पवार म्हणाले.

फोटो २६०६२०२१-कोल-शिवाजी युनिव्हर्सिटी

फोटो ओळ: मुख्य प्रशासकीय इमारत व राजर्षी शाहू संशोधन केंद्रामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रकुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत व शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक डॉ. जयसिंगराव पवार, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते.