शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

अकाली मृत्यू वाढले, मृत्युपत्राची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST

कोल्हापूर : कोरोना आजाराच्या फैलावामुळे अचानक मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी, दीड वर्षापासून मुद्रांक प्रशासनाकडे नोंदणीकृत मृत्युपत्र करणाऱ्यांची ...

कोल्हापूर : कोरोना आजाराच्या फैलावामुळे अचानक मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी, दीड वर्षापासून मुद्रांक प्रशासनाकडे नोंदणीकृत मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या घटली आहे. जिल्हा मुद्रांक प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. लॉकडाऊन असल्यानेही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अनेकांना मृत्युपत्र करण्यात अडचणी येत आहेत. यापूर्वी वर्षाला सरासरी ८२५ मृत्युपत्रे होत होती. आता ही संख्या ७०० पर्यंत आली आहे.

मृत्यूनंतर आपली स्थावर आणि जंगम मालमत्ता कायदेशीररीत्या कुणाला मिळावी, यासाठी मृत्युपत्र केले जाते. मृत्युपत्र केल्याने संबंधिताच्या वारसांमध्ये मृत्यूनंतर न्यायालयीन वाद फारसे होत नाहीत. यामुळे साध्या मुद्रांक पत्रकावर किंवा नोंदणीकृत मृत्युपत्र केले जाते. गेल्या दहा वर्षांत मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे जिल्हा मुद्रांक प्रशासनाचे म्हणणे आहे. पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड हे दुर्गम तालुके वगळता जिल्ह्याच्या इतर तालुक्यांत रोज सरासरी एक ते दोन मृत्युपत्र २०१९ पर्यंत होत होती. सन २०२० मध्ये कोरोनाचा फैलाव जिल्ह्यात सुरू झाला. त्यानंतर मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या घटली. प्रवासावर निर्बंध आणल्याने इच्छा असतानाही अनेकांना मृत्युपत्र करता आले नाही. अकाली निधन झाल्याच्याही घटना घडत आहेत. कोरोनाचा प्रभाव अजूनही कायम असल्याने गेल्या महिनाअखेरपर्यंतही त्याची संख्या कमीच आहे.

कोट

कोरोनाचा फैलाव झाल्याने इच्छा असूनही अनेकांना मृत्युपत्र करता आलेले नाही. मृत्युपत्र करून देणाऱ्याची शारीरिक, मानसिक स्थिती चांगली असावी. त्याने दोन साक्षीदारांसमोर मृत्युपत्र केल्यास त्याला कायदेशीर मान्यता आहे. यासाठी मुद्रांक कार्यालयात जाऊनच ही प्रक्रिया करावी, असे नाही, घरातही मुद्रांंकपत्रावर मृत्युपत्र करता येते.

ॲड. धैर्यशील सुतार

कोट

कोरोनामुळे मृत्युपत्र करण्यात अनेक अडचणी येत आहेत. यामुळे अलीकडे मृत्युपत्राची संख्या कमी झाली आहे. ज्येष्ठामध्ये मृत्युपत्र करण्याची मानसिकता जास्त असते. असुरक्षित वाटत असल्याने तेही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतात. गंभीर आजारी असल्यास काही तरुण मृत्युपत्र करतात; पण अशांचे प्रमाण कमी आहे.

ॲड. अजित मोहिते

चौकट

दहा टक्के घट

जिल्ह्यात सन २०१८ साली ८११, सन २०१९ मध्ये ७०७, सन २०२० मध्ये ७७१ आणि या वर्षी मे २०२१ पर्यंत २४५ जणांनी मृत्युपत्र केले आहे. तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मृत्युपत्र २०१८ मध्ये झाले आहेत. त्यानंतर २०१९ मध्ये वर्षभरात १०४ नी मृत्युपत्रांची संख्या घटली. २०२० मध्ये पुन्हा थोडी म्हणजे ७८ नी वाढ झाली. कोरोनाआधी दुर्गम तालुके वगळता इतर ठिकाणी रोज १ ते २ मृत्युपत्र होत होते. आता आठवड्यातील अनेक दिवस एकही मृत्युपत्र होत नाही. सन २०१८ च्या तुलनेत आता मृत्युपत्रांची संख्या सरासरी दहा टक्क्यांनी घटली आहे.

कमी वयात मृत्युपत्र केलेल्यांची प्रतिक्रिया

१ गंभीर आजाराने त्रस्त असल्याने मृत्युपत्र केले. मृत्यूनंतर मालमत्तेसंबंधी भांडणे होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतला. कोरोनामुळे काही प्रमाणात अडचणी आल्या.

२ घरगुती वाद आणि कोरोनाच्या आजारामुळे मृत्यू कधीही येईल, या भीतीपोटी मृत्युपत्र केले. मृत्युपत्रात स्वकमाईच्या मालमत्तेची नोंद केली. वडिलाेपार्जित मालमत्तेची नोंद केली नाही.

३ कोरोना महामारीमुळे मनात भीती निर्माण झाली. यातूनच मृत्युपत्र करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील सर्व सदस्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला. मृत्युपत्र करताना कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या. तरीही आजारामुळे घाईने मृत्युपत्र केले.