शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

सौरपंप बसविण्यासाठी प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:18 IST

कोल्हापूर : पाणी आवक क्षमता असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातपंपांना सौरपंप बसविण्याबरोबरच ज्या हातपंपांची पाणी आवक क्षमता कमी आहे, त्याठिकाणी ...

कोल्हापूर : पाणी आवक क्षमता असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातपंपांना सौरपंप बसविण्याबरोबरच ज्या हातपंपांची पाणी आवक क्षमता कमी आहे, त्याठिकाणी पुनर्भरण योजना राबविण्याची सूचना राज्याचे भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली.

कलशेट्टी यांनी शनिवारी येथील भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेच्या जिल्हा कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचे सहसंचालक मिलिंद देशपांडे, भूवैज्ञानिक ऋषीराज गोसकी, कनिष्ठ भूवैज्ञानिक शिवलिंग चव्हाण, सांगलीचे भूवैज्ञानिक जयंत मिसाळ, भूवैज्ञानिक दिलावर मुल्ला, संतोष गोंधळी, श्री. नदाफ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. कलशेट्टी म्हणाले, संभाव्य काळातील टंचाई परिस्थितीत जिल्ह्यातील जनतेला पिण्याचे पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी आतापासूनच नियोजन करावे. भूजल अधिनियमाचेही जिल्ह्यात तंतोतंत पालन करण्यावरही भर द्या, अशी सूचनाही त्यांनी केली.

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या उद्‌भवस्रोतांचे १०० टक्के नमुने तपासावेत, सर्व स्रोतांचे आयएमआयएस संकेतस्थळावर अद्ययावत करण्याचे कामही जिल्हा परिषदेच्या सहकार्यातून करावे. प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने कार्यरत करावी.

यावेळी त्यांनी अटल भूजल योजनेच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील कामाचाही आढावा घेतला. जलस्वराज्य टप्पा क्र. २ अंतर्गत जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या ९६४ निरीक्षण विहिरींची माहिती घेऊन त्यांचे वाचन घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेतला.