शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

हद्दवाढीसाठी उद्या शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: August 21, 2016 00:20 IST

दसरा चौकात ठिय्या : आज मध्यवर्ती बसस्थानकावर मेळावा

कोल्हापूर : अधिसूचना तातडीने काढून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्यावतीने उद्या, सोमवारी दसरा चौकात शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार जनजागृती मेळाव्यात केला. शक्तिप्रदर्शनाचा भाग म्हणून सोमवारी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांसह शहरवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी झाला. येत्या आठवड्यात हद्दवाढीच्या मागणीचा लढा तीव्र करत शासनाला हद्दवाढीच्या निर्णयासाठीभाग पाडू, असाही निर्धार केला. आज, रविवारी सायंकाळी सात वाजता मध्यवर्ती बसस्थानकावर महालक्ष्मी चेंबर्समध्ये दुसरा जनजागृती मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी भाकपचे सतीशचंद्र कांबळे, लालासाहेब गायकवाड, प्रताप देसाई, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, चंद्रकांत जाधव, सुरेश जरग यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी बाबा पार्टे, वहिदा मुजावर, रेखा आवळे, बजरंग शेलार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)दबावतंत्र चालणार नाही : क्षीरसागरउजळाईवाडी विमानतळावर विमान उतरू देणार नाही, अशा पद्धतीची दादागिरी खपवून घेणार नाही. दबावतंत्र वापरून हद्दवाढ रोखण्याचा प्रयत्न नेत्यांनी बंद करावा, मतांच्या राजकारणासाठी शहरासह ग्रामीण भागाचे नुकसान करत आहेत. हद्दवाढीनंतर येणाऱ्या आय.टी.सह इतर उद्योगांमुळे ग्रामीण ग्रामीण भागाचे कल्याण होईल, असे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले. महापालिकेवर चुकीची टीका करून दबावतंत्र वापरत दादागिरी करण्याचा प्रयत्न केल्यास ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असाही इशारा क्षीरसागर यांनी दिला. शासन बदलले, आरक्षणाचा उद्योग संपलाजमिनीवर आरक्षण टाकण्याचे उद्योग यापूर्वी झाले, आता शासन बदलले तसेच महापालिकेवरील स्थित्यांतरे झाल्याने आरक्षण टाकणे व उठविणे हा उद्योग यापुढे होणार नाही, असे भाजपचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी स्पष्ट केले. रवीकिरण इंगवले यांनीही टीका केली.अभी नहीं तो कभी नहींशहरवासीयांचा आता अंत पाहू नका, असे सांगत सोमवारच्या शक्तिप्रदर्शनात महापालिका, के.एम.टी., शाळा, महाविद्यालये, तालीम सहभागी होणार असल्याचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी सांगून, ‘अभी नहीं तो कभी नहीं’ अशा निर्णायक लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.एका व्यासपीठावर याशहरवासीय व महापालिकेवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या ग्रामीण नेत्यांनी आमने-सामने यावे, एकाच व्यासपीठावर येऊन आरोप सिद्ध करावे, असे आव्हान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी केले.