शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात एलईडी पथदिव्यांमुळे विजेची बचत

By admin | Updated: March 26, 2017 23:40 IST

पथदिवे प्रकल्पाची वर्षपूर्ती : महिन्याकाठी सव्वा लाखाची वीज बचत

संदीप बावचे ल्ल जयसिंगपूरकथित गैरव्यवहारप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या जयसिंगपूर शहरातील एलईडी पथदिवे प्रकल्पाला वर्ष पूर्ण होत आहे. या प्रकल्पामुळे निश्चितच विजेची बचत झाली आहे. महिन्याकाठी सरासरी पावणेदोन लाख रुपये सध्या वीजबिल येत असून, एलईडी पथदिव्यामुळे महिन्याकाठी सव्वालाख रुपयांची बचत असे पालिकेचे वार्षिक पंधरा लाख रुपयांचे वीजबिल कमी झाले आहे. ज्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात आला; तो निश्चितच फायदेशीर ठरला आहे. आखीव-रेखीव अशी जयसिंगपूर शहराची ओळख आहे. स्वच्छ प्रकाश आणि विजेची बचत या धोरणानुसार जयसिंगपूर पालिकेने तेराव्या वित्त आयोगातून शहरात एलईडी पथदिवे हा प्रकल्प राबविला होता. १ कोटी ९० लाख रुपये खर्च करून एलईडी पथदिवे बसविण्यात आले. सुमारे १७३८ एलईडी बल्ब वापरण्यात आले आहेत. एलईडी पथदिवे लावण्यापूर्वी स्ट्रीट लाईटमुळे सुमारे २ हजार युनिट वीज खर्च होत होती. त्यापोटी सुमारे ३ लाख रुपये देखभाल व दुरुस्तीसाठी खर्च होत होते. मार्च २०१६ मध्ये एलईडी पथदिवे प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या प्रकल्पामुळे सध्या महिन्याकाठी १ लाख ७५ हजार रुपये वीज बिल येते. सरासरी सव्वा लाख रुपयांची बचत महिन्याकाठी झाल्यामुळे या वीज बचतीतून पालिकेचे वर्षाला पंधरा लाख रुपये वाचले आहेत. यामुळे वीज बिलाचा आर्थिक ताण कमी झाला आहे. ज्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली तो उद्देश आणखी पूर्णत्वास येण्यासाठी पालिका प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. एलईडीमुळे विजेची बचतगेल्या वर्षभरापासून जयसिंगपूर शहर पथदिव्यांनी उजळून गेले आहे. या प्रकल्पानंतर पन्नास टक्के विजेची बचत होणार असा पालिकेचा अंदाज होता. मात्र, विद्युत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्यातरी ४० टक्के विजेची बचत होत आहे. हा प्रकल्प राबविणारी कंपनी सात वर्षे देखभाल दुरुस्ती करणार आहे. आणखी काही भागात नवीन विजेच्या खांबाबरोबर पथदिव्यांची गरज आहे. गैरव्यवहाराचा आरोप कागदावरचजयसिंगपूर नगरपालिकेने शहरात बसविलेल्या एलईडी पथदिव्याच्या कामात १ कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्वाभिमानी युवा आघाडीने केला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीदेखील दाखल झाल्या होत्या. गैरव्यवहाराच्या आरोपावरुन पालिका सभाही गाजली होती. गैरव्यवहाराचा आरोप करणाऱ्यांनी पुढे काय पाठपुरावा केला, हे अजूनही स्पष्ट केलेले नाही. पथदिव्यांची दुरुस्तीजयसिंगपूर शहरात एलईडी पथदिवे लावण्यात आल्यानंतर काही ठिकाणी पथदिवे लागत नसल्याच्या तक्रारी सुरुवातीला झाल्या होत्या. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा झाली. मात्र, सध्या काही ठिकाणी पथदिवे बंद असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत नगरपालिका विद्युत विभागाशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्या ठिकाणी पथदिवे लागत नव्हते, त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे.