शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

खोची परिसरात विद्युत केबल चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या प्रकारास पुन्हा सुरुवात झाली आहे. वारणा नदी काठचा शेतकरी या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या प्रकारास पुन्हा सुरुवात झाली आहे. वारणा नदी काठचा शेतकरी या प्रकाराने हैराण झाला आहे. पुन्हा आपले डोके वर काढीत चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान व मनस्ताप पोलिसांनी थांबवावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

खोची येथील येथील वारणा नदीकाठी गेल्या चार-पाच दिवसांत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालून सुमारे दोन लाखांच्या केबल लंपास केल्या आहेत. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीसच हे प्रकार झाल्याने पिकांना वेळेत पाणी देणे मुश्किल होऊन बसले आहे. निष्कारण पाण्याअभावी पिके वाळण्यास सुरवात झाली आहे.शेतकरी या प्रकाराने वैतागून गेला आहे.

शेवाळे टेक ते दुधगाव गोंड परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. रात्री विद्युत पुरवठा नसतो त्यावेळी नदीकाठच्या शेतीवर शेतकरी नसतात. तसेच विद्युत पुरवठ्याचा धोका नसतो. हे साधून चोरट्यांनी चोरीची मोहीम फत्ते करण्याचा सपाटा लावला आहे. केबलमधील तांब्याची तार महागडी असते. केबलचे आवरण काढून त्यातील तार लंपास केली जात आहे. इतरत्र किंवा लांब अंतरावर केबलचे आवरण काढून टाकले असल्याचे दिसून येते.

या भागात वारणा नदीवरून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या योजना बहुतांश शेतकऱ्यांनी स्वतःच्या नेल्या आहे. तसेच सहकारी संस्थांच्या सुद्धा मोठ्या योजना आहे. भेंडवडे, लाटवडे, बुवाचे वाठार परिसरातही पाणीपुरवठा करणाऱ्या संस्था जास्त आहेत. या योजनेमुळेच येथील ऊसशेती अधिक आहे. भाजीपाला, फळपिके असणारी शेती ही वाढत आहे. आता तर उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. त्यामुळे पाण्याचे करेक्ट नियोजन शेतकरी करतो. पण केबल चोरीमुळे साहजिकच पाणीपुरवठा खंडित होतो. पिके वाळतात. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. नेमका तोच प्रकार आता दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यातच दहा ते पंधरा शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. दोन शेतकऱ्यांची सलग दोन दिवसांत दोनवेळा केबल चोरी झाली आहे. चोरी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी नवीन केबल घातली. ती सुद्धा त्याच रात्री चोरीला गेली.

प्रकाराने परिसरात चिंता निर्माण झाली आहे.

या चोरट्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे पोलिसांच्या समोर पुन्हा आव्हान निर्माण केले आहे. वडगाव पोलिसांनी यंत्रणा गतिमान करून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.