शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

खोची परिसरात विद्युत केबल चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या प्रकारास पुन्हा सुरुवात झाली आहे. वारणा नदी काठचा शेतकरी या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या प्रकारास पुन्हा सुरुवात झाली आहे. वारणा नदी काठचा शेतकरी या प्रकाराने हैराण झाला आहे. पुन्हा आपले डोके वर काढीत चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान व मनस्ताप पोलिसांनी थांबवावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

खोची येथील येथील वारणा नदीकाठी गेल्या चार-पाच दिवसांत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालून सुमारे दोन लाखांच्या केबल लंपास केल्या आहेत. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीसच हे प्रकार झाल्याने पिकांना वेळेत पाणी देणे मुश्किल होऊन बसले आहे. निष्कारण पाण्याअभावी पिके वाळण्यास सुरवात झाली आहे.शेतकरी या प्रकाराने वैतागून गेला आहे.

शेवाळे टेक ते दुधगाव गोंड परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. रात्री विद्युत पुरवठा नसतो त्यावेळी नदीकाठच्या शेतीवर शेतकरी नसतात. तसेच विद्युत पुरवठ्याचा धोका नसतो. हे साधून चोरट्यांनी चोरीची मोहीम फत्ते करण्याचा सपाटा लावला आहे. केबलमधील तांब्याची तार महागडी असते. केबलचे आवरण काढून त्यातील तार लंपास केली जात आहे. इतरत्र किंवा लांब अंतरावर केबलचे आवरण काढून टाकले असल्याचे दिसून येते.

या भागात वारणा नदीवरून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या योजना बहुतांश शेतकऱ्यांनी स्वतःच्या नेल्या आहे. तसेच सहकारी संस्थांच्या सुद्धा मोठ्या योजना आहे. भेंडवडे, लाटवडे, बुवाचे वाठार परिसरातही पाणीपुरवठा करणाऱ्या संस्था जास्त आहेत. या योजनेमुळेच येथील ऊसशेती अधिक आहे. भाजीपाला, फळपिके असणारी शेती ही वाढत आहे. आता तर उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. त्यामुळे पाण्याचे करेक्ट नियोजन शेतकरी करतो. पण केबल चोरीमुळे साहजिकच पाणीपुरवठा खंडित होतो. पिके वाळतात. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. नेमका तोच प्रकार आता दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यातच दहा ते पंधरा शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. दोन शेतकऱ्यांची सलग दोन दिवसांत दोनवेळा केबल चोरी झाली आहे. चोरी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी नवीन केबल घातली. ती सुद्धा त्याच रात्री चोरीला गेली.

प्रकाराने परिसरात चिंता निर्माण झाली आहे.

या चोरट्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे पोलिसांच्या समोर पुन्हा आव्हान निर्माण केले आहे. वडगाव पोलिसांनी यंत्रणा गतिमान करून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.