शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

वडगावात सुट्टीदिवशी वाटल्या पोस्टमननी राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क/सुहास जाधव पेठवडगाव : सध्याचे युग हे जलद संपर्काचे डिजिटल युग आहे. मात्र, या काळातदेखील काही ...

लोकमत न्यूज नेटवर्क/सुहास जाधव

पेठवडगाव : सध्याचे युग हे जलद संपर्काचे डिजिटल युग आहे. मात्र, या काळातदेखील काही गोष्टी या आभासी जगापेक्षा महत्त्वाच्या असतात. अशी गोष्ट म्हणजे बहिणीने पाठवलेली राखी. आभासी जगातील संवादापेक्षा ही राखी आजची मानकरी आणि म्हणूनच बहीण-भावाच्या नात्यातील गोडवा जपण्यासाठी चक्क सुट्टीदिवशी पेठ वडगावातील तीन पोस्टमन बांधवांनी घरोघरी राखीची टपाल पोहोचवली.

सध्या सोशल मीडियामुळे नातेवाईक एका क्लिकवर आले आहेत. क्षणात संपर्क साधून एकमेकांशी संभाषण, संवादाची देवाणघेवाण सहज शक्य झाली आहे. मात्र, बहिणीने पाठविलेल्या एका धाग्याला रक्षाबंधनादिवशी जे महत्त्व असते त्याची जागा अजूनही कोणी घेतलेली नाही. धावपळीच्या युगात तर नात्यातील ओलावा रक्षाबंधनच्या निमित्ताने जपला जातो. पारंपरिकरीत्या पोस्टातून हजारो मैलांवरून बहीण आपल्या भावाला राखी पाठवतात, पण नेमका आज रविवार आल्यामुळे बहिणीचे हे बंधन भावापर्यंत पोहोचविण्याचे काम पोस्ट खात्यासमोर आव्हानाचे होते. सुट्टीची पर्वा न करता वडगावातील पोस्टमन श्रीकांत कुलकर्णी, विजयसिंह धुंदरे, देवधान वाघमारे यांनी बहीण-भावांच्या नात्यातील ओलावा जपण्यासाठी शहरात रविवारी पोस्टातून आलेल्या राखीच्या टपालांचे वाटप केले. त्यामुळे अनेक भावांना दुहेरी प्रेम ओलावा दिसून आला. पोस्टमन बांधवांच्या या आपुलकीबद्दल सत्कार करून काही नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.