शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

नव्या पदाधिकाऱ्यांच्या निधीत कपात होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माजी सभापती जुन्या निधीसाठी पुन्हा उचल खाल्ली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार नव्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माजी सभापती जुन्या निधीसाठी पुन्हा उचल खाल्ली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार नव्या पदाधिकाऱ्यांच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे. एकदा निधी मंजूर झाल्यानंतर पुन्हा कपात होण्याच्या शक्यता असल्याने सत्तारूढांमध्येच धुसफूस वाढण्याची शक्यता आहे.

मुळात बजरंग पाटील, सतीश पाटील, हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने यांचे राजीनामे चांगले पाच महिने लांबले. शिवसेनेच्या मुंबईतील वरिष्ठ नेत्यांना चार वेळा त्यासाठी कोल्हापुरात यावे लागले. यानंतर शिवसेेनेने अर्जुन आबिटकर यांच्यावर जबाबदारी देऊन त्यांनी या सभापतींचे राजीनामे घेण्याआधी त्यांच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा प्रश्न मिटवायचा, असे ठरले होते. त्यानुसार आबिटकर यांनी सर्व माजी पदाधिकाऱ्यांसोबत धावपळ करून हा प्रश्न मिटवत आणला आणि त्यानंतर राजीनामे झाले.

जुलै २०२१ मध्ये नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. त्यानंतर गेल्या पंधरवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेआधी अध्यक्ष राहुल पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची भेट घेऊन निधी वितरणाचे सूत्र निश्चित केले. परंतु एवढे झाले तरी अजून या जुन्या पदाधिकाऱ्यांच्या निधीचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. त्यामुळे या सर्वांनी पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली होती. आम्हाला दिलेला शब्द पाळला नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर पाटील यांनी यात लक्ष घालून विषय संपवा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी अध्यक्ष राहुल पाटील यांना दिल्या. त्यानुसार आता सदस्यांच्या निधीला हात घातला तर पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता असल्याने विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या निधीत थोडी कपात करून जुन्यांची भरपाई करण्याचे सूत्र पुढे आल्याचे समजते.

चौकट

राहुल पाटील, शिंपी यांच्यात अजिंक्यताऱ्यावर चर्चा

आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप करत अध्यक्षांसह सभापतींना निषेधाचे पत्र देणारे जयवंतराव शिंपी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी हे गैरसमजाचे प्रकरण बारा तासांत संपवून टाकले. सकाळीच पाटील यांनी शिंपी यांना फोन करून कोल्हापूरला येण्याची विनंती केली. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांच्या कार्यालयात स्वतंत्रपणे पाटील, शिंपी यांच्यात चर्चा झाली. शिक्षक पुरस्कार निवडीसाठी आपण स्वत निरोप दिल्याचे या वेळी अमर पाटील यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनीही निरोप दिला होता. पुणे येथील पुरस्कार वितरणाला कोरोनामुळे तिघांनाच निमंत्रित केले होते, असे सांगून पाटील यांनी त्यांचे गैरसमज दूर केले. या पुढच्या काळात सर्व बैठकांचे निरोप तुम्हाला मी स्वत: देईन, असेही पाटील यांनी सांगितले.