शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

प्रारुप प्रभाग रचनेवर हरकतींची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST

एप्रिल किंवा मे महिन्यात महानगरपालिकेची निवडणुक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रारुप प्रभाग रचना सादर करण्यास ...

एप्रिल किंवा मे महिन्यात महानगरपालिकेची निवडणुक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रारुप प्रभाग रचना सादर करण्यास महापालिकेला कळविले होते. प्रारुप प्रभाग रचना तयार करताना शहराच्या लोकसंख्येचा विचार केला जातो. संपूर्ण देशात २०११ मध्ये जनगणना झाली आहे. तीच जनगणना आधारभूत धरुन गेल्या निवडणुकीत म्हणजे सन २०१५ मध्ये प्रभाग रचना करण्यात आली होती.

परंतु आता होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना तयार करताना कोणती लोकसंख्या आधारभूत धरण्यात आली आहे, प्रशासनाने पाच प्रभागांत जे बदल सुचविले आहेत आणि ज्याचा परिणाम अन्य पाच प्रभागांवर होणार आहे, त्याला कोणता आधार देण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नवीन प्रारुप प्रभाग रचना ही २०११च्या जनगणनेनुसारच झाली पाहिजे, परंतु प्रशासनाने पाच प्रभागांत लोकसंख्या वाढली हे कोणत्या आधारावर गृहित धरले अशी शंका काही जाणकारांनी व्यक्त केली आहे. जर पाच प्रभागांची लोकसंख्या वाढली असेल तर दहाच प्रभागांवर त्याचा परिणाम होत नाही, तर सर्वच प्रभागांवर होत असतो. प्रारुप प्रभाग रचना करताना निवडणूक आयोगाचे निकष पाळावे लागतात. ते निकष येथे पाळले गेले नसावेत, अशी जाणकारांना शंका आहे.

या महिन्याच्या अखेरपर्यंत ही प्रारुप प्रभाग रचना जनतेच्या माहितीसाठी जाहीर होणार आहे. ती जाहीर होताच त्यावर हरकती दाखल करण्याची तयारी सुरू आहे. काहींनी तर हरकतींची सुनावणी झाल्यानंतर प्रसंगी न्यायालयात जाण्याचीही आतापासून तयारी सुरू केली आहे.