शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडच्या शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

By admin | Updated: December 10, 2015 00:56 IST

१६५ ठिकाणी जमीन भूसंपादनासाठी आरक्षण : नगरविकास खात्याच्या नोटिसीची होळी

मुरगूड : नगर विकास खात्याने मुरगूड (ता. कागल) शहराच्या सुधारित विकास आराखड्यामध्ये १६५ ठिकाणी विविध कारणांसाठी जमीन भूसंपादनासाठी आरक्षण टाकले आहे. या आरक्षणाला तीव्र विरोध करीत हरकतीच्या सुनावणीसाठी पाठविलेल्या शासनाच्या नोटिसीची संतप्त शेतकऱ्यांनी नगरपालिकेसमोरच होळी केली. शासनाने आपल्या भावना लक्षात घेतल्या नाही तर १६५ शेतकरी नगरपालिकेच्या समोर सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी तणावपूर्ण वातावरणात हरकतीवरील सुनावणी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पार पडली. मुरगूड शहराच्या विकासाच्या दृष्टीने भविष्यात होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अंदाज घेऊन क्रीडांगण, प्राथमिक शाळा, शॉपिंग सेंटर, बगीचा, पाण्याची टाकी, जिम्नॅशिअम हॉल व अंतर्गत रस्ते, आदींसाठी १६५ शेतकऱ्यांच्या अंदाजे ३० ते ३५ एकर बागायत शेतीवरच नगरविकास खात्याने आरक्षण टाकलेले आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाला, भूखंडधारकाला अंधारात ठेवून आरक्षणे टाकली आहेत. जर यामध्ये जमिनी गेल्या तर बरेच शेतकरी भूमिहीन होतील, असा आक्षेप घेत विकास आराखडा व आरक्षणाला भूखंडधारक व नगरपालिका प्रशासनाने विरोध केला आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी नगरविकास खात्यामार्फत बुधवारी पालिकेच्या सभागृहात हरकती पार पडल्या. यासाठी पुणे नगररचना विभागाचे सहसंचालक पी. जी. भुक्ते, कोल्हापूर नगररचना विभागाचे सहायक संचालक एस. एन. चव्हाण, सहायक नगररचनाकार कुलकर्णी, के. वाय. पाटील, के. पी. यादव, पासळकर यांचे पथक आले होते. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सुरुवातीलाच हरकतींवरील सुनावणीसाठी पाठवलेल्या नोटिसीची पालिकेसमोर होळी करीत शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी शंखध्वनी केला. यावेळी माजी नगरसेवक एम. डी. रावण यांनी आरक्षणे चुकीची असल्याबाबत पुरावे दाखल केले. संजय भारमल म्हणाले, शहराचा विकास करीत असताना नापीक व पडीक जमिनीचाच वापर करावा, असे शासनाने सांगितले असताना त्याला हरताळ फासण्याचे काम मुरगूड आरक्षणामुळे झाले आहे. न्याय मिळाला नाही तर कायदेशीर आंदोलन लढण्याचा इरादा स्पष्ट केला. यावेळी विशाल सूर्यवंशी, विनायक रामले, विलासराव सूर्यवंशी, इस्माईल नायकवडी, उदय शहा, संदीप सूर्यवंशी उपस्थित होते. मागणीचे निवेदन नगररचना सहसंचालक पी. जी. भुक्ते यांना दिले. (वार्ताहर)नगरपालिकेचा विरोध : शेतकऱ्यांनी घाबरू नयेनगरविकास खात्याकडून विकास आराखडा तयार करताना पालिका प्रशासनाला अंधारात ठेवले आहे. या आरक्षणाला आमचाही विरोध असून, या आरक्षणामुळे काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधाचा ठरावही संमत करणार आहोत.- प्रवीणसिंह पाटील, सभागृह नेता, मुरगूड नगरपरिषदआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना धीर देत सहसंचालक पी. जी. भुक्ते यांनी सांगितले की, आपण घाबरून जाऊ नका. तुम्हाला डावलून शासन कोणताच निर्णय घेणार नाही. आपल्या संतप्त भावना मी वरिष्ठांना कळविणार असून, कोणाचेही नुकसान होणार नाही.