शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

आरे ते सावरवाडीदरम्यान बंधाऱ्याच्या संरक्षण कठड्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : करवीर तालुक्याच्या पंधरा गावांच्या दळण-वळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या आरे ते सावरवाडीदरम्यान तुळशी नदीपात्रातील बंधाऱ्यावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सावरवाडी : करवीर तालुक्याच्या पंधरा गावांच्या दळण-वळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या आरे ते सावरवाडीदरम्यान तुळशी नदीपात्रातील बंधाऱ्यावरील संरक्षण कठड्याची दुरवस्था निर्माण झाली आहे. संरक्षण कठड्याची अनेक ठिकाणी पडझड झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागते. संरक्षण कठड्याचे बांधकाम रेंगाळल्याने सामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

तुळशी नदीच्या पात्रात सन १९५६ साली या बंधाऱ्याची शेतीच्या पाण्यासाठी उभारणी करण्यात आली होती. या बंधाऱ्यावरून करवीर पश्चिम भागातील पंधरा गावांच्या परिसरातील वाहतूक सुरू असते. या बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे पावसाळा ऋतूमध्ये पुराच्या पाण्यात हा बंधारा बुडला जातो. परिणामी पावसाळ्यामध्ये ग्रामीण वाहतूक बंद होते.

गेल्या ६५ वर्षांतील बंधाऱ्याचे बांधकाम जीर्ण होऊ लागले आहे. बंधाऱ्याच्या पृष्ठभागातील काही दगडी बांधकामाचे दगड कोसळू लागले आहेत. बंधाऱ्याचा पश्चिमकडील भरावा अनेक वेळा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

आरे ते सावरवाडीदरम्यान तुळशी नदीपात्रात राज्य शासनाने नव्याने बंधाऱ्याचे बांधकाम करण्याची मागणी गेली पाच वर्षांपासून जनतेतून होऊ लागली आहे. मात्र, या मागणीकडे शासकीय पातळीवर दुर्लक्ष होऊ लागले आहे.

फोटो ओळ - आरे ते सावरवाडी (ता. करवीर) दरम्यान तुळशी नदीपात्रातील बंधाऱ्यावरील संरक्षण कठड्याची दुरवस्था निर्माण झाल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.