शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

आरे ते सावरवाडीदरम्यान बंधाऱ्याच्या संरक्षण कठड्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : करवीर तालुक्याच्या पंधरा गावांच्या दळण-वळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या आरे ते सावरवाडीदरम्यान तुळशी नदीपात्रातील बंधाऱ्यावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सावरवाडी : करवीर तालुक्याच्या पंधरा गावांच्या दळण-वळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या आरे ते सावरवाडीदरम्यान तुळशी नदीपात्रातील बंधाऱ्यावरील संरक्षण कठड्याची दुरवस्था निर्माण झाली आहे. संरक्षण कठड्याची अनेक ठिकाणी पडझड झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागते. संरक्षण कठड्याचे बांधकाम रेंगाळल्याने सामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

तुळशी नदीच्या पात्रात सन १९५६ साली या बंधाऱ्याची शेतीच्या पाण्यासाठी उभारणी करण्यात आली होती. या बंधाऱ्यावरून करवीर पश्चिम भागातील पंधरा गावांच्या परिसरातील वाहतूक सुरू असते. या बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे पावसाळा ऋतूमध्ये पुराच्या पाण्यात हा बंधारा बुडला जातो. परिणामी पावसाळ्यामध्ये ग्रामीण वाहतूक बंद होते.

गेल्या ६५ वर्षांतील बंधाऱ्याचे बांधकाम जीर्ण होऊ लागले आहे. बंधाऱ्याच्या पृष्ठभागातील काही दगडी बांधकामाचे दगड कोसळू लागले आहेत. बंधाऱ्याचा पश्चिमकडील भरावा अनेक वेळा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

आरे ते सावरवाडीदरम्यान तुळशी नदीपात्रात राज्य शासनाने नव्याने बंधाऱ्याचे बांधकाम करण्याची मागणी गेली पाच वर्षांपासून जनतेतून होऊ लागली आहे. मात्र, या मागणीकडे शासकीय पातळीवर दुर्लक्ष होऊ लागले आहे.

फोटो ओळ - आरे ते सावरवाडी (ता. करवीर) दरम्यान तुळशी नदीपात्रातील बंधाऱ्यावरील संरक्षण कठड्याची दुरवस्था निर्माण झाल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.