शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

फोडणी महागली; भाजीपाला आवाक्यात

By admin | Updated: August 22, 2016 00:29 IST

बाजारभाव : तूरडाळीची घसरण सुरू

कोल्हापूर : तेलाची मागणी वाढल्याने ऐन सणात किलोमागे दोन रुपयांची वाढ झाल्याने तेलाने ग्राहकांचा चांगलाच झटका दिला आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर कमालीचे कमी झाले आहेत. तूरडाळीच्या दरात घसरण सुरू झाली असून किलोमागे तब्बल दहा रुपयांनी दर कमी झाला आहे. फळबाजारातील आवक व मागणी सारखीच असल्याने फारशी चढउतार दिसत नाही. साखर ४० रुपयांवर स्थिर राहिली आहे. हरभराडाळ, मूग, मूगडाळ, मटकीच्या दरांत फारसा चढउतार दिसत नाही. शाबूची मागणी वाढली असली तरी ६० रुपयांवर स्थिर राहिली आहे. तूरडाळीच्या दरात घसरण सुरू झाली असून किरकोळ बाजारात १४० रुपयांपर्यंत डाळ आली आहे. भाजीपाला बाजारात फळे व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. कोबी, टोमॅटो, श्रावण घेवडा, ढबू, गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडका या भाज्यांच्या दरांत घसरण झाली आहे. वांग्यांचे दर मात्र स्थिर असून पांढरी वांगी ४० ते ६० रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. कोंथिबिरीची आवक वाढूनही दर तेजीत आहेत. गूळ ५५ रुपयांवर! किरकोळ बाजारात गुळाचा दर ५५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ऐन गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर गुळाची मागणी अधिक असते. मागणी वाढण्यापूर्वीच गूळ भडकल्याने ऐन सणात गुळाचा साठ रुपयांचा टप्पा पार होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. कांदा-बटाटा स्थिर गत आठवड्याच्या तुलनेत कांदा व बटाट्याच्या दरांत फारसा चढउतार दिसत नाही. घाऊक बाजारात कांदा साडेसात, बटाटा १८, तर लसूण ९० रुपये प्रतिकिलो असा दर आहे. घाऊक बाजारातील प्रमुख भाज्यांचे प्रतिकिलोचे दर असे कोबी- ६, वांगी- ३०, टोमॅटो- ८, ढबू- ३०, घेवडा- १२, गवार- १८, ओला वाटाणा- ५५, कारली- ३५, वरणा- २२, दोडका- १५. झोपडपट्टीवासीयांसाठी ‘पंतप्रधान आवास’चा प्रस्ताव इचलकरंजी नगरपालिका : लाभार्थ्यांची बैठक घेणार - सदा मलाबादे इचलकरंजी : शहरामधील नेहरूनगर झोपडपट्टीमधील लाभार्थ्यांसाठी नगरपालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने त्यांचा समावेश पंतप्रधान आवास योजनेत करण्यात यावा, अशा आशयाचा प्रस्ताव नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी लालबावटा झोपडपट्टी संघटनेसमोर ठेवला आहे. हा प्रस्ताव नेहरूनरमधील लाभार्थ्यांसमोर ठेवून त्यांची बैठक घेण्यात येईल, असे संघटनेचे अध्यक्ष सदा मलाबादे यांनी यावेळी सांगितले. नेहरूनगर झोपडपट्टीमध्ये सुमारे ६३६ झोपड्या आहेत. त्यापैकी ४४४ लाभार्थ्यांनी अपार्टमेंट पद्धतीने घरकुले मिळावीत, यासाठी त्यांच्या हिश्श्याची रक्कम नगरपालिकेकडे जमा केली आहे. त्यापैकी फक्त ४८ घरकुले असणारी एकच इमारत बांधून तयार झाली आहे. परिणामी राजकीयदृष्ट्या रखडलेल्या या घरकुलांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. लाभार्थी मात्र घरकुलांसाठी झोपडपट्टीची जागा रिकामी करून अन्यत्र भाड्याने राहत आहेत. तरी लाभार्थ्यांना तातडीने घरकुले बांधून द्यावीत; अन्यथा लालबावटा झोपडपट्टी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला. याबाबत नगराध्यक्षा बिरंजे, मुख्याधिकारी डॉ. रसाळ, संघटनेचे अध्यक्ष सदा मलाबादे, शिवगोंड खोत, नगरसेवक विठ्ठल चोपडे, नगर अभियंता बापूसाहेब चौधरी, अभियंता संजय बागडे, आदींची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत घरकुलांसाठी आवश्यक असलेला ७ कोटी ६० लाखांचा वाढीव निधी पालिकेकडे उपलब्ध नाही, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी दिली. त्यामुळे लाभार्थ्यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये सहभागी व्हावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावर बोलताना मलाबादे यांनी सर्व लाभार्थी झोपडपट्टीवासीयांची बैठक घेऊन या बैठकीत या नव्या प्रस्तावाबाबत विचार करण्यात येईल, असे सांगितले.