शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

पोलिसांनी तपासामध्ये हात झटकले की टेकले?

By admin | Updated: January 18, 2016 00:33 IST

डॉक्टर कुलकर्णी खून प्रकरण : आज इस्लामपूर बंद; सीआयडीकडे तपास देण्याची मागणी

अशोक पाटील -- इस्लामपूर -डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि त्यांची पत्नी डॉ. अरुणा कुलकर्णी यांच्या खुनामागचे मुख्य सूत्रधार मोकाटच असल्याचा दावा काही संघटनांनी केला आहे. पोलिसांची भूमिका पाहता, या तपास प्रकरणात त्यांनी हात झटकले, की टेकले? असा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे या खून प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत व्हावा, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. यासाठी सोमवार १८ रोजी इस्लामपूर बंदची हाक देण्यात आली आहे.डॉ. कुलकर्णी दाम्पत्य खून प्रकरणाला १ महिना लोटला तरी, खुनातील मुख्य सूत्रधार सापडलेले नाहीत, असा संशय काही संघटनांनी व्यक्त केला आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी तपासासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे कैफियत मांडली आहे. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा काही संशयितांना ताब्यात घ्यावे लागले. परंतु पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. या प्रकरणात सध्या पोलिसांनी मौन पाळले असल्याने, त्यांना विविध संघटनांच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे.खून प्रकरणातील संशयित तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या तिघांपलीकडे पोलिसांचा तपास सरकलेला नाही. त्यामुळे शहरातील काही संघटनांनी एकत्र येऊन, हा तपास सी.बी.आय.कडे द्यावा अशी मागणी केली आहे. यासाठीच सोमवारी बंदची हाक देण्यात आली आहे. सोमवारी होणाऱ्या बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाडिक युवा मंच, एन.एस.यु.आय., वैद्यकीय व्यावसायिक संघटना, आर.पी.आय. यांनी पाठिंबा दर्शविला आहे. शहरातील बाजारपेठा ओस पडल्या आहेत. दिवसाढवळ्या महिलांचे दागिने लुटले जात आहेत. चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सावकारीतून झालेल्या आत्महत्या हा वाळवा तालुक्याला लागलेला कलंकच मानावा लागेल. तसेच सकाळी फिरावयास गेलेल्या रमेश शेटे या व्यापाऱ्यावर विष प्रयोग करुन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न याच इस्लामपुरात झाला. याचाही तपास ठप्पच आहे. या प्रकरणावर कोणीही आवाज उठविला नाही. गेल्या दोन महिन्यात गुन्हेगारी फोफावली आहे. या गुन्हेगारीपुढे पोलीस हतबल झाले आहेत. इस्लामपूर बंद ठेवणे हा पर्याय असू शकत नाही. यासाठी इस्लामपूर पोलीस ठाण्यात खमका पोलीस अधिकारी येणेच गरजेचे आहे.वैशाली शिंदेंना हवी बदलीइस्लामपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर दोन महिने सर्वकाही आलबेल चालले होते. त्यामुळे शांतता असलेल्या तालुक्यात आपली बदली झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. परंतु गेल्या तीन ते चार महिन्यात वाळवा, शिराळा तालुक्यात गुन्हेगारीने अक्षरश: कळस गाठला आहे. एकापाठोपाठ एक गुन्हे घडत असल्याने आता त्यांना शांत भागात बदली हवी आहे.डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याच्या खुनाची शहरात घडलेली बाब निंदनीय आहे. या घटनेचा पोलिसांकडून योग्य तपास झालेला नाही. त्यामुळे शहरातील विविध संघटनांनी पुकारलेला बंद हा योग्यच आहे. त्याला माझा वैयक्तिक पाठिंबा राहील.- सुभाष सूर्यवंशी, नगराध्यक्ष, इस्लामपूर.