शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पोलिसांनी तपासामध्ये हात झटकले की टेकले?

By admin | Updated: January 18, 2016 00:33 IST

डॉक्टर कुलकर्णी खून प्रकरण : आज इस्लामपूर बंद; सीआयडीकडे तपास देण्याची मागणी

अशोक पाटील -- इस्लामपूर -डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि त्यांची पत्नी डॉ. अरुणा कुलकर्णी यांच्या खुनामागचे मुख्य सूत्रधार मोकाटच असल्याचा दावा काही संघटनांनी केला आहे. पोलिसांची भूमिका पाहता, या तपास प्रकरणात त्यांनी हात झटकले, की टेकले? असा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे या खून प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत व्हावा, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. यासाठी सोमवार १८ रोजी इस्लामपूर बंदची हाक देण्यात आली आहे.डॉ. कुलकर्णी दाम्पत्य खून प्रकरणाला १ महिना लोटला तरी, खुनातील मुख्य सूत्रधार सापडलेले नाहीत, असा संशय काही संघटनांनी व्यक्त केला आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी तपासासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे कैफियत मांडली आहे. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा काही संशयितांना ताब्यात घ्यावे लागले. परंतु पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. या प्रकरणात सध्या पोलिसांनी मौन पाळले असल्याने, त्यांना विविध संघटनांच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे.खून प्रकरणातील संशयित तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या तिघांपलीकडे पोलिसांचा तपास सरकलेला नाही. त्यामुळे शहरातील काही संघटनांनी एकत्र येऊन, हा तपास सी.बी.आय.कडे द्यावा अशी मागणी केली आहे. यासाठीच सोमवारी बंदची हाक देण्यात आली आहे. सोमवारी होणाऱ्या बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाडिक युवा मंच, एन.एस.यु.आय., वैद्यकीय व्यावसायिक संघटना, आर.पी.आय. यांनी पाठिंबा दर्शविला आहे. शहरातील बाजारपेठा ओस पडल्या आहेत. दिवसाढवळ्या महिलांचे दागिने लुटले जात आहेत. चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सावकारीतून झालेल्या आत्महत्या हा वाळवा तालुक्याला लागलेला कलंकच मानावा लागेल. तसेच सकाळी फिरावयास गेलेल्या रमेश शेटे या व्यापाऱ्यावर विष प्रयोग करुन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न याच इस्लामपुरात झाला. याचाही तपास ठप्पच आहे. या प्रकरणावर कोणीही आवाज उठविला नाही. गेल्या दोन महिन्यात गुन्हेगारी फोफावली आहे. या गुन्हेगारीपुढे पोलीस हतबल झाले आहेत. इस्लामपूर बंद ठेवणे हा पर्याय असू शकत नाही. यासाठी इस्लामपूर पोलीस ठाण्यात खमका पोलीस अधिकारी येणेच गरजेचे आहे.वैशाली शिंदेंना हवी बदलीइस्लामपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर दोन महिने सर्वकाही आलबेल चालले होते. त्यामुळे शांतता असलेल्या तालुक्यात आपली बदली झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. परंतु गेल्या तीन ते चार महिन्यात वाळवा, शिराळा तालुक्यात गुन्हेगारीने अक्षरश: कळस गाठला आहे. एकापाठोपाठ एक गुन्हे घडत असल्याने आता त्यांना शांत भागात बदली हवी आहे.डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याच्या खुनाची शहरात घडलेली बाब निंदनीय आहे. या घटनेचा पोलिसांकडून योग्य तपास झालेला नाही. त्यामुळे शहरातील विविध संघटनांनी पुकारलेला बंद हा योग्यच आहे. त्याला माझा वैयक्तिक पाठिंबा राहील.- सुभाष सूर्यवंशी, नगराध्यक्ष, इस्लामपूर.