शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
2
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
3
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
4
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
5
“आम्ही दोघं राजा-राणी…” विरुष्काचं प्रेम अन् MS धोनी–साक्षीची ‘राजकुमारी’सोबतची खास फ्रेम चर्चेत
6
भारताची चीनवर कडी...! 'या' उत्पादनातही मागे टाकलं; ड्रॅगनची चिंता वाढली
7
डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का
8
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
9
उड्डाणापूर्वी एअर इंडियाचा पायलट दारू प्यायला; अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात, DGCA कारवाई करणार
10
रवींद्र चव्हाणांनी शब्द दिला, १०० टक्के भाजपाचं तिकीट तुम्हालाच, मग अचानक रात्री काय घडलं?
11
AI मुळे नोकऱ्या जाणार का? आनंद महिंद्रा यांनी मांडले 'ब्रेन गेन'चे सूत्र; नव्या वर्षात युवकांना दिला यशाचा मंत्र
12
Switzerland Blast: स्वित्झर्लंड हादरलं! न्यू इयर सेलिब्रेशन सुरू असतानाच रिसॉर्टमध्ये भीषण स्फोट; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
13
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
14
Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात
15
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
16
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
17
12 Grape Theory: घड्याळाचे १२ ठोके अन् १२ द्राक्ष; नवं वर्षात चमकेल नशीब; काय आहे 'ग्रेप थ्योरी', तरुणाईला लावलं वेड
18
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
19
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
20
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना पाच किलोमीटर धावण्याची सक्ती

By admin | Updated: August 14, 2016 01:04 IST

शारीरिक तंदुरुस्तीसाठी ‘हेल्थ चेकअप’ : विश्वास नांगरे-पाटील यांची माहिती

कोल्हापूर : पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. त्यामुळे बहुतांश पोलिसांना हृदयविकार, मधुमेह, पोटविकार, सांधेदुखी, आदी आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील १८ हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ‘हेल्थ चेकअप’ केले जाणार आहे. पोलिस शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहिले तरच ते चोवीस तास काम करू शकतात. त्यामुळे त्यांना रोज सकाळी व्यायामाबरोबर पाच किलोमीटर धावण्यासाठी सक्ती केली जाणार आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. नांगरे-पाटील म्हणाले, नागरिकांची सुरक्षा सांभाळणाऱ्या कोल्हापूर परिक्षेत्रातील १८ हजारपैकी तब्बल ४० टक्के पोलिस अधिकारी व कर्मचारी शारीरिकदृष्ट्या ‘अन्फिट’ असल्याचे समोर आले आहे. रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखीसह मानसिक असंतुलनाचे ते शिकार बनले आहेत. व्यायामाच्या अभावामुळे पोलिसांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. पोलिस खात्यात भरती होताना उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाते. ज्यांची ही क्षमता चांगली आहे, त्यांनाच खात्यामध्ये प्रवेश मिळतो; परंतु खात्यामध्ये भरती झाल्यावर शरीर सुदृढ ठेवण्याकडे दुर्लक्ष होते. पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे हे चुकीचे आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याचा अधिकारी शारीरिकदृष्ट्या फिट असेल तर कर्मचारीही फिट राहतात. व्यायामाचा अभावामुळे अनेक अधिकाऱ्यांची शरीराची रचना अनफिट झाली आहे. रोज व्यायामाची सवय असणाऱ्यांना दिवसभर ताण किंवा शारीरिक त्रास जाणवत नाही. परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्णांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेहमी शारीरिकदृष्ट्या फिट राहावे, यासाठी त्यांना रोज पाच किलोमीटर धावण्याची सक्ती केली जाईल. प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यावर माझे पथक लक्ष ठेवून असेल. घरांचा प्रश्न मार्गी लावणार परिक्षेत्रात पोलिसांसाठी २ हजार ७०० निवासस्थाने प्रस्तावित आहेत. त्यामध्ये कोल्हापूर एक हजार, सांगली ६००, पुणे ग्रामीण ५०० आदींचा समावेश आहे. सातारा येथील ६९० घरांना गृहविभागाने मंजुरी दिली आहे. या सर्व निवासस्थांनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.