शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टरवर खरिपाचे नियोजन

By admin | Updated: May 19, 2015 00:20 IST

हंगाम २०१५-१६ साठी खरिपाचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

हंगाम २०१५-१६ साठी खरिपाचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन लाख ९० हजार हेक्टर खरीप पेरणी योग्य क्षेत्रापैकी दोन लाख ७६ हजार ६०० हेक्टरवर भात, ज्वारी, नागली, सोयाबीन, भुईमूग ही प्रमुख पिके घेण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी हवामान विभागाकडून चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. खरीप हंगामाला जून महिन्यापासून सुरुवात होत असली, तरी जिल्ह्यात खरिपामध्ये मुख्य पीक असणाऱ्या भात पिकासाठी जिल्ह्याच्या बहुतांश भागात धूळवाफ पेरण्या केल्या जातात. यासाठी बियाणे वेळेत शेतकऱ्यांना पुरविण्यासाठी कृषी विभागाचे नियोजन सुरू आहे. जिल्ह्यात भात पिकाखाली एक लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रांवर लावण होणार आहे. यासाठी महाबीज व शासकीय पातळीवर १५ हजार ७५८ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे बियाण्यांची टंचाई भासणार नाही, असे सांगण्यात आले आहे.सोयाबीनच्या लागवडीखाली ७९ हजार हेक्टर क्षेत्रांवर यावर्षी पेरणी होणार आहे. सोयाबीनच्या बियाण्यांसाठी स्थानिक शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या सोयाबीनचा वापर बियाण्यांसाठी करण्याकरिता शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया प्रबोधन करण्यात येणार आहे. सोयाबीन स्वपरागीकरणात विविधता असल्याने तीन-चार वर्षे बियाण्यांसाठी वापरता येते. यामुळे बियाणांचा खर्च वाचणार आहे, असेही सांगण्यात आले.भुईमुगाच्या पिकाखाली यावर्षी ५८ हजार ९०० हेक्टरवर पेरणी होणार आहे, तर नागली २२ हजार ७०० व ज्वारीची पाच हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे. यावर्षी कोणत्याही पिकासाठी बियाण्यांचा तुटवडा भासणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. या सर्व पिकांसाठी २४ हजार ४६६ क्विंटल बियाणे महाबीज व शासकीय पातळीवरून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.दरम्यान, तालुक्यात उन्हाळी भुईमुगाची काही ठिकाणी काढणी सुरू झाली आहे. उसाच्या लागणीत घेण्यात आलेल्या आंतर पिकांचीही काढणी सुरू आहे. सध्या उसाच्या भरणीची कामे सर्वत्र जोरात सुरू आहेत. भरणी करताना रासायनिक खतांचा मात्राही दिला जात आहे. तुर, मूग, उडीद पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. मात्र, ही पिके आंतरपिके म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. विशेषत: गडहिंग्लज, कागल, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यांत ती घेतली जातात. जास्त पावसाच्या तालुक्यांत ही पिके घेतली जात नाहीत. कारण जादा पावसाने यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने त्यातून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे ही पिके घेण्याचे इतर तालुक्यांतील शेतकरी टाळतात.यंदाच्या खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करण्यात आलेले आहे. बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची फसगत होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे आणि रायायनिक खतांची कमतरता भासणार नाही.- डी. बी. पाटील, करवीर तालुका कृषी अधिकारी५प्रकाश पाटील, कोपार्डे