शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

साखर उद्योग संपला तर त्यास पीयूष गोयल जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस साखर कारखानदारी मोडीत निघाली आहे. याबाबत केंद्रीय वाणिज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस साखर कारखानदारी मोडीत निघाली आहे. याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना लक्ष घालण्याची विनंती केली. मात्र, ते व्यापारी असल्याने दुर्लक्ष करत आहेत. महाराष्ट्रातील साखर उद्योग संपला तर त्यास मंत्री गोयल जबाबदार असतील, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी दिला.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ‘ई-लॉबी’ भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, साखरेचे दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये आणि उसाची एफआरपी याचा ताळमेळ बसत नाही. टनामागे ४०० ते ५०० रुपये कमी पडत असल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे. पुढील हंगामात उसाचे आणखी पीक वाढणार आहे. मात्र, साखर कारखाने बंद पडण्याचा धोका आहे. कारखान्यांचे कंबरडे मोडल्यानंतर निर्यातीचा निर्णय घेतला.

म्हणून ‘पी. एन.’ यांचा राजीनामा

केंद्र सरकारच्या धोरणामुळे साखर उद्योग परवडत नाही. त्यामुळेच पी. एन. पाटील यांनी ‘भोगावती’च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचा गाैप्यस्फोट मंत्री मुश्रीफ यांनी केला.

उपपंतप्रधान पदासाठी मुश्रीफांना शुभेच्छा

जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीचे भूमिपूजन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. भूमिपूजनानंतर ते थेट देशाचे उपपंतप्रधान झाले. आता या इमारतीचे भूमिपूजन हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले, तेही उपपंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा पी. एन. पाटील यांनी दिल्या. यावर मुश्रीफ यांनी त्यांचे आभार मानले.