शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

पिराची ३७४ देवस्थाने वक्फ मंडळाकडे हस्तांतरित

By admin | Updated: June 17, 2015 00:38 IST

शासनाचा निर्णय : खंड भरण्यासाठी औरंगाबादला हेलपाटे

विश्वास पाटील - कोल्हापूर -पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील कोल्हापूर जिल्ह्यातील ३७४ पिराची देवस्थाने औरंगाबादच्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे हस्तांतरित झाली आहेत. त्यामुळे या देवस्थानांच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना खंड भरण्यासाठी आता औरंगाबादला हेलपाटे मारावे लागणार आहेत. अशीच स्थिती राज्यभरातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची आहे.कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत देवस्थान समितीचे कार्यक्षेत्र आहे. तीन हजार ६४ मंदिरांचे व्यवस्थापन ही समिती करते. या मंदिरांच्या मालकीची १७ ते १८ हजार एकर जमीन आहे. तिच्या मालकी हक्काबाबतही प्रचंड गोंधळ आहे. त्याचे सातबारे नीट नाहीत. ही जमीन कोण कसते, त्याची माहितीही समितीला नाही. मुस्लिम धर्मीयांच्या जमिनीबाबत देवस्थान समिती व वक्फ मंडळ अशा दोन्ही पातळ्यांवर गोंधळात गोंधळ आहे. देवस्थानकडे कोल्हापूर जिल्ह्यांतील ३७४ देवस्थानची नोंद आहे. त्यांमध्ये पीर, पीर दर्गा, हजरत मुस्लिम, हजरत, हुसेन बादशहा, फकीर मशीद, अशी ही पिराची देवस्थाने आहेत. त्यांचे दर्गे व शेतजमिनी आहेत. पूर्वी या दोन्ही देवस्थानांचे व्यवस्थापन देवस्थान समिती पाहत असे. या दर्ग्यांचा काही उत्सव असेल तर रंगरंगोटी व चालू दुरुस्तीसाठी काही रक्कम देवस्थान समिती देत असे; परंतु शासनातर्फे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. वाय. पटेल यांनी ३१ जुलै २००६ रोजी गॅझेट करून ही देवस्थाने वक्फ मंडळाकडे हस्तांतरित करावीत, असे आदेश काढले; परंतु प्रत्यक्षात मंडळाने तसे देवस्थान समितीला कळविले नाही. देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांनाच असा आदेश झाला असल्याचे कुठेतरी समजल्यावर त्यांनी या जमिनींशी संबंधित कागदपत्रे मंडळाकडे सुपूर्द केली आहेत. प्रत्यक्षात या नक्की किती जमिनी आहेत, त्या आता कोण कसत आहे, त्यांचा वार्षिक खंड किती जमा होतो, याची कोणतीही माहिती देवस्थानकडे उपलब्ध नाही. ती वक्फ मंडळाकडेही उपलब्ध नसल्याचे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. हा आदेश पाहून देवस्थान समितीने जिल्हाधिकाऱ्यांना ही पिराची देवस्थाने वक्फ मंडळाकडे हस्तांतरित केल्याचे कळविले आहे.ही जमीन कसणारे शेतकरी आतापर्यंत गावातच तलाठ्याकडे, काही तहसीलदार कार्यालयात, तर काही देवस्थान समितीकडे वार्षिक खंड आणून भरत असत; परंतु आता समितीने हा खंड भरून घेणे बंद केले आहे. पिराची देवस्थाने औरंगाबादला वक्फ मंडळाकडे हस्तांतरित केल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे खंड भरा, असे देवस्थानचे म्हणणे आहे. रोज पाच-सहा शेतकरी देवस्थानकडे हेलपाटे मारीत आहेत. या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर ‘देवस्थान’ किंवा ‘पिराची जमीन’ असा शेरा असतो. वर्षाला खंड भरल्यामुळे जमीन कसत असल्याबद्दलचा महत्त्वाचा कायदेशीर पुरावा उपलब्ध होतो; परंतु आता त्यासाठी त्यांना औरंगाबादला जावे लागणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यात खंड भरून घेण्याची वक्फ मंडळाची व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी औरंगाबादला येऊनच खंड भरणे बंधनकारक आहे.- बेग इफ्तिकार उल्ला, प्रतिनिधी, राज्य वक्फ मंडळ, औरंगाबादआमच्याकडे गावातील पीर देवस्थानची जमीन आहे. त्याचा खंड एक हजार रुपये प्रतिवर्षी भरत होतो; परंतु आता तो भरण्यासाठी दोन हजार रुपये खर्चून औरंगाबादला जावे लागणार आहे. त्यापेक्षा मंडळानेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीवर अथवा विशिष्ट बँकेत खंड भरून घेण्याची व्यवस्था केल्यास आमचा त्रास वाचू शकेल.- मनोज माने, खंडकरी शेतकरी, भादोलेखंड असतो किती...पूर्वी हा खंड एकरी २००, १५० व १२५ रुपये असा जमिनीच्या प्रतीनुसार होता. पुढे २००९-१० पासून समितीने ऊसपीक असलेल्या जमिनीसाठी एकरी १५०० व जिरायत शेतीसाठी ३०० रुपये केला आहे. देवस्थान समितीला वर्षाला ३० लाख रुपयांचे उत्पन्न खंडातून मिळते, अशी माहिती देवस्थान समितीचे सहसचिव शिवाजी साळवी यांनी ‘लोकमत’ला दिली.