शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
3
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
4
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
5
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
8
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
9
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
10
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
11
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
12
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
13
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
14
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
15
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
16
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
17
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
18
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
19
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
20
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर यांचे तत्त्वज्ञान जगाला महाविनाशापासून वाचवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:23 IST

कोल्हापूर : भगवान महावीर यांचे अहिंसात्मक तत्त्वज्ञानच जगाला महाविनाशापासून वाचवेल, असा आशावाद शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाचे समन्वयक डॉ. ...

कोल्हापूर : भगवान महावीर यांचे अहिंसात्मक तत्त्वज्ञानच जगाला महाविनाशापासून वाचवेल, असा आशावाद शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाचे समन्वयक डॉ. व्ही. बी. ककडे यांनी व्यक्त केला.

भगवान महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव वार्ता’ यू ट्यूब वाहिनीवरील ‘शिव वार्ता संवाद’ या कार्यक्रमांतर्गत ‘महावीर की महाविनाश?’ या विषयावर डॉ. ककडे यांची विशेष मुलाखत जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी घेतली.

डॉ. ककडे म्हणाले, नैसर्गिक साधन संपत्तीची अपरिमित हानी, सत्तासंघर्ष, संपत्तीचे केंद्रीकरण आदी अनेक कारणांनी जग एका मोठ्या विनाशाकडे निघाले आहे. या विनाशापासून जगाला वाचवायचे असेल तर भगवान महावीरांच्या सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह या मूल्यांचा अंगीकार प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवर करावयास हवा. भगवान महावीरांनी कोणत्याही देवाची अगर व्यक्तीची पूजा केली नाही, तर त्यांनी सदैव या मानवी मूल्यांचीच उपासना केली. एखाद्या विषयावर साकल्याने सर्वंकष विचार करणे हा सम्यक दर्शनाचा विशेष आहे. त्यापुढील पायरी म्हणजे सम्यक ज्ञान आहे. अर्थात एखाद्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त करवून घेणे. या दोन पायऱ्या आज जगाने बऱ्यापैकी गाठलेल्या आहेत. तथापि, अद्याप सम्यक चारित्र्यापर्यंतचा प्रवास आपल्याला करावयाचा आहे. त्यासाठी भगवान महावीरांचे तत्त्वज्ञान मुळापासून समजावून घेण्याची, अंगीकृत करण्याची गरज असल्याचेही ककडे यांनी सांगितले.

चाैकट ०१

अध्यासन केंद्राची ग्रंथमाला

महावीर अध्यासनातर्फे जैन धर्मातील २४ तीर्थंकर आणि त्यांच्या योगदानाची, शिकवणीची किमान माहिती लोकांना व्हावी, यासाठी २४ पुस्तकांची ग्रंथमाला प्रकाशित केली आहे. जैन धर्मातील कोणीही आंतरजातीय विवाह केला, तर जैन तत्त्वज्ञानाची माहिती त्यांना व्हावी, यासाठी हा संच भेट देण्याचा उपक्रम समाजात राबवला जात आहे.