शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

भगवान महावीर यांचे तत्त्वज्ञान जगाला महाविनाशापासून वाचवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:23 IST

कोल्हापूर : भगवान महावीर यांचे अहिंसात्मक तत्त्वज्ञानच जगाला महाविनाशापासून वाचवेल, असा आशावाद शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाचे समन्वयक डॉ. ...

कोल्हापूर : भगवान महावीर यांचे अहिंसात्मक तत्त्वज्ञानच जगाला महाविनाशापासून वाचवेल, असा आशावाद शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाचे समन्वयक डॉ. व्ही. बी. ककडे यांनी व्यक्त केला.

भगवान महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव वार्ता’ यू ट्यूब वाहिनीवरील ‘शिव वार्ता संवाद’ या कार्यक्रमांतर्गत ‘महावीर की महाविनाश?’ या विषयावर डॉ. ककडे यांची विशेष मुलाखत जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी घेतली.

डॉ. ककडे म्हणाले, नैसर्गिक साधन संपत्तीची अपरिमित हानी, सत्तासंघर्ष, संपत्तीचे केंद्रीकरण आदी अनेक कारणांनी जग एका मोठ्या विनाशाकडे निघाले आहे. या विनाशापासून जगाला वाचवायचे असेल तर भगवान महावीरांच्या सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह या मूल्यांचा अंगीकार प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवर करावयास हवा. भगवान महावीरांनी कोणत्याही देवाची अगर व्यक्तीची पूजा केली नाही, तर त्यांनी सदैव या मानवी मूल्यांचीच उपासना केली. एखाद्या विषयावर साकल्याने सर्वंकष विचार करणे हा सम्यक दर्शनाचा विशेष आहे. त्यापुढील पायरी म्हणजे सम्यक ज्ञान आहे. अर्थात एखाद्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त करवून घेणे. या दोन पायऱ्या आज जगाने बऱ्यापैकी गाठलेल्या आहेत. तथापि, अद्याप सम्यक चारित्र्यापर्यंतचा प्रवास आपल्याला करावयाचा आहे. त्यासाठी भगवान महावीरांचे तत्त्वज्ञान मुळापासून समजावून घेण्याची, अंगीकृत करण्याची गरज असल्याचेही ककडे यांनी सांगितले.

चाैकट ०१

अध्यासन केंद्राची ग्रंथमाला

महावीर अध्यासनातर्फे जैन धर्मातील २४ तीर्थंकर आणि त्यांच्या योगदानाची, शिकवणीची किमान माहिती लोकांना व्हावी, यासाठी २४ पुस्तकांची ग्रंथमाला प्रकाशित केली आहे. जैन धर्मातील कोणीही आंतरजातीय विवाह केला, तर जैन तत्त्वज्ञानाची माहिती त्यांना व्हावी, यासाठी हा संच भेट देण्याचा उपक्रम समाजात राबवला जात आहे.