शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

जिल्ह्यातील ‘शेकाप’चे बुरुज ढासळू लागले

By admin | Updated: January 19, 2017 23:59 IST

राज्यस्तरावर पक्षाला ‘भरती’ : एकापाठोपाठ एक कार्यकर्त्याकडून पक्षाला सोडचिठ्ठी

प्रवीण देसाई-- कोल्हापूर --एकेकाळी कोल्हापूरसह निम्म्या महाराष्ट्रावर हुकुमत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे जिल्ह्यातील बुरुज ढासळू लागले आहेत. राजेंद्र सूर्यवंशी, शामराव सूर्यवंशी, दिगंबर लोहार, निवास लाड यांच्यासारख्या शिलेदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. एका बाजूला राज्यस्तरावर प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या मोठ्या कार्यकर्त्यांची ‘भरती’ सुरू असताना कोल्हापूरच्या बालेकिल्ल्यात ‘ओहोटी’लागल्याचे चित्र आहे.‘सर्वसामान्य, कष्टकरी व शेतकऱ्यांचा पक्ष’ म्हणून उदयास आलेल्या शेतकरी कामगार पक्षाने कायम सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. परिणामी हा पक्ष बघता-बघता स्वातंत्र्योत्तर काळात निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात विस्तारला. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण यांसह अन्य ठिकाणी या पक्षाची अनेक दशके हुकुमत होती. कोल्हापूर तर या पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पक्षाचा आता जिल्ह्यात एकही आमदार राहिलेला नाही. कठीण परिस्थितीतही सध्या माजी आमदार संपतराव पवार-पाटील हे जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा पक्ष टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहेत. तरीही या पक्षाचे एकेक बुरुज ढासळू लागल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शेका पक्षाचे कार्यकर्ते व शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी व त्यांचे बंधू करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी पक्षाला रामराम करून कॉँग्रेसची कास धरली आहे. तसेच पक्षाचे खजानिस निवास लाड यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यातच शहरातील क्रियाशील कार्यकर्ते व शहर सरचिटणीस दिगंबर लोहार यांनीही पक्षाचा राजीनामा देऊन ‘बळिराजा पार्टी’ची स्थापना केली आहे. ते या पक्षाचे संस्थापक-महासचिव आहेत. प्रत्येकाचा पक्षातून बाहेर पडण्याचा उद्देश वेगळा असला तरी पक्षनेतृत्वाचे धोरण यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मुलुखमैदान तोफ असलेले संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुकताच पुण्यात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शेका पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह इतर मान्यवरांच्या प्रवेशाच्या माध्यमातून राज्यस्तरावर ‘भरती’ सुुरू असताना कोल्हापुरात मात्र पक्षाला ‘ओहोटी’ लागल्याचे दिसत आहे. दिग्गजांची पक्षविस्तारात मोलाची भूमिकाभाऊसाहेब महागावकर, दाजिबा देसाई, विजयमाला राणीसरकार, आदींनी लोकसभेत, तर त्र्यंबकराव कारखानीस, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, गोविंदराव कलिकते, तुकाराम कोलेकर, संपतराव पवार-पाटील, आदी दिग्गजांनी विविध मतदारसंघांतून विधानसभेत प्रतिनिधित्व करत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले आहेत. माजी महापौर नानासाहेब यादव, माजी नगराध्यक्ष एम. के. जाधव, संभाजीराव चव्हाण, आनंदराव साळोखे, प्रा. विष्णुपंत इंगवले आदींनी शहरात पक्षसंघटना विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली.