शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

जिल्ह्यातील ‘शेकाप’चे बुरुज ढासळू लागले

By admin | Updated: January 19, 2017 23:59 IST

राज्यस्तरावर पक्षाला ‘भरती’ : एकापाठोपाठ एक कार्यकर्त्याकडून पक्षाला सोडचिठ्ठी

प्रवीण देसाई-- कोल्हापूर --एकेकाळी कोल्हापूरसह निम्म्या महाराष्ट्रावर हुकुमत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे जिल्ह्यातील बुरुज ढासळू लागले आहेत. राजेंद्र सूर्यवंशी, शामराव सूर्यवंशी, दिगंबर लोहार, निवास लाड यांच्यासारख्या शिलेदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. एका बाजूला राज्यस्तरावर प्रवीण गायकवाड यांच्यासारख्या मोठ्या कार्यकर्त्यांची ‘भरती’ सुरू असताना कोल्हापूरच्या बालेकिल्ल्यात ‘ओहोटी’लागल्याचे चित्र आहे.‘सर्वसामान्य, कष्टकरी व शेतकऱ्यांचा पक्ष’ म्हणून उदयास आलेल्या शेतकरी कामगार पक्षाने कायम सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. परिणामी हा पक्ष बघता-बघता स्वातंत्र्योत्तर काळात निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात विस्तारला. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण यांसह अन्य ठिकाणी या पक्षाची अनेक दशके हुकुमत होती. कोल्हापूर तर या पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पक्षाचा आता जिल्ह्यात एकही आमदार राहिलेला नाही. कठीण परिस्थितीतही सध्या माजी आमदार संपतराव पवार-पाटील हे जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा पक्ष टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहेत. तरीही या पक्षाचे एकेक बुरुज ढासळू लागल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शेका पक्षाचे कार्यकर्ते व शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी व त्यांचे बंधू करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी पक्षाला रामराम करून कॉँग्रेसची कास धरली आहे. तसेच पक्षाचे खजानिस निवास लाड यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यातच शहरातील क्रियाशील कार्यकर्ते व शहर सरचिटणीस दिगंबर लोहार यांनीही पक्षाचा राजीनामा देऊन ‘बळिराजा पार्टी’ची स्थापना केली आहे. ते या पक्षाचे संस्थापक-महासचिव आहेत. प्रत्येकाचा पक्षातून बाहेर पडण्याचा उद्देश वेगळा असला तरी पक्षनेतृत्वाचे धोरण यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मुलुखमैदान तोफ असलेले संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुकताच पुण्यात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शेका पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह इतर मान्यवरांच्या प्रवेशाच्या माध्यमातून राज्यस्तरावर ‘भरती’ सुुरू असताना कोल्हापुरात मात्र पक्षाला ‘ओहोटी’ लागल्याचे दिसत आहे. दिग्गजांची पक्षविस्तारात मोलाची भूमिकाभाऊसाहेब महागावकर, दाजिबा देसाई, विजयमाला राणीसरकार, आदींनी लोकसभेत, तर त्र्यंबकराव कारखानीस, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, गोविंदराव कलिकते, तुकाराम कोलेकर, संपतराव पवार-पाटील, आदी दिग्गजांनी विविध मतदारसंघांतून विधानसभेत प्रतिनिधित्व करत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले आहेत. माजी महापौर नानासाहेब यादव, माजी नगराध्यक्ष एम. के. जाधव, संभाजीराव चव्हाण, आनंदराव साळोखे, प्रा. विष्णुपंत इंगवले आदींनी शहरात पक्षसंघटना विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली.