शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

पर्ससीन परवाना नकोच; हरित न्यायालयाचा आदेश

By admin | Updated: June 3, 2015 00:59 IST

आर्थिक विषमता त्यामुळे अनेकवेळा मच्छिमारात संघर्षही झाला होता. या पर्ससीन व मिनी पर्ससीन मासेमारीमुळे होणारे जैव विविधतेचे नुकसान, मत्स्य प्रजोत्पादनावर होणारा विपरित परिणाम,

मालवण : पर्ससीन वा मिनी पर्ससीन नेटच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या कोणत्याही बोटधारकाला मेरीटाईम बोर्ड तसेच मत्स्य विभागाने परवाना देऊ नये, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या न्यायमूर्ती विकास चितगावकर व डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ३५ हजार अन्यायग्रस्त पारंपरिक मच्छिमार कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणात २८ मे ला सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण मच्छिमार संघाने दाखल केलेल्या पर्यावरण हित याचिकेच्या सुनावणीदरम्यान अ‍ॅड. असिम सरोदे यांनी पारंपरिक मच्छिमार समाजाची बाजू मांडली. पर्ससीन आणि मिनी पर्ससीन नेटधारकांकडून पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाप्रमाणेच समुद्री जैव विविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याविषयीची माहिती देताना नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रवीकिरण तोरस्कर म्हणाले, सागरी जैव विविधतेची नासधूस होतानाच पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार मच्छिमार बांधवांचा जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष वेधून त्वरित तात्पुरत्या स्वरूपाचे आदेश पर्ससीन व मिनी पर्ससीन धारकांविरोधात मंजूर करावेत, अशी आमची मागणी होती.यांत्रिकी पद्धतीच्या पर्ससीन व मिनी पर्ससीननेट धारकांबाबतचा प्रश्न मागील ३० वर्षांपासून सुरू आहे. आता तो राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणासमोर ठेवण्यात आला आहे. १६ मिनी पर्ससीन आणि मिनी पर्ससीननेटच्या माध्यमातून समुद्रातील मासळी पकडली जात असल्याने निर्माण होणारी मोठी आर्थिक विषमता त्यामुळे अनेकवेळा मच्छिमारात संघर्षही झाला होता. या पर्ससीन व मिनी पर्ससीन मासेमारीमुळे होणारे जैव विविधतेचे नुकसान, मत्स्य प्रजोत्पादनावर होणारा विपरित परिणाम, सागरी तटरक्षक दलाचा नाकर्तेपणा, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा असंवेदनशीलपणा, आदी बाबी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या माध्यमातून हरित न्यायाधीकरणासमोर मांडण्यात येत असल्याचे तोरस्कर म्हणाले. (प्रतिनिधी)मच्छिमारांना दिलासाशून्य ते १२ नॉटीकल मैल अंतरात पर्ससीन आणि मिनी पर्ससीन नेट धारकांना मासेमारी बंदी करावी, पर्ससीन मासेमारीमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाचा अहवाल तयार करावा, पावसाळी मासेमारी बंदी काळ हा सर्वत्र सारखाच म्हणजे ९० दिवसांचा असावा, अशा मागण्या न्यायाधीकरणासमोर मांडण्यात आल्या होत्या. या याचिकेचा अंतिम निकाल महाराष्ट्रातील लाखो मच्छिमार कुटुंबांच्या जीवनाशी निगडीत असल्याने तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, यामुळे पारंपरिक मच्छिमार कुटुंबांना दिलासा मिळणार असल्याचे रवीकिरण तोरस्कर यांनी सांगितले.